विषय:-रस्ता सुरक्षा अभियान निमित्त
रस्त्याचं मनोगत
माझं काय चुकलं .
माझं काय चुकलं .
तुम्ही जायचे ,या ठिकाणाहून
त्या ठिकाणी
लहानांपासुन मोठ्यांपर्यंत
त्या ठिकाणी
लहानांपासुन मोठ्यांपर्यंत
मला आनंद व्हायचा
माझ्यावरचे छोटे मोठे खड्डे बघुन
तुम्ही संतापायचे,प्रसंगी शिव्याही द्यायचे
कधी नशिब उघडेलरे याचं,दुरुस्त होणार
कधी हा, एकदम बोगस झालाय .
मला वाईट वाटायचं,स्वतःबद्दल रागही यायचा
पण मी आशावादी पडलो ना
होहोईल एकेदिवशी सारं सुरळीत
या आशेवर जगायचो ,दिवस रेटायचो.
कधी तुम्ही त्या खड्यांची पुजा करायचे,सुधारणे साठी निवेदन द्यायचे,पेपरात छापायचे
तरीही मला आनंद व्हायचा
.....आणि बदल घडला
खडी आली ,माणसं आली,डांबर आलं ,यंत्र सामुग्री आली
थोड्याच दिवसात माझं परिवर्तन करुन गेली
मी चकाचक दिसायला लागलो,खड्यांपासुन मुक्तीचा आनंदोत्सव मनात साजरा करु लागलो.
तुम्ही आनंदित झाले अन् वेगात धावले
गतीने गती घेतली,तुम्ही कधी नियम तोडले,मोबाइलवर बोलत ,स्वतःची सुरक्षितता दूर लोटत सुसाट धावले.
तुमच्या काळजी साठी माझ्या शरिरावर लावलेल्या खाणाखुणांकडे तुम्ही जाणीवपुर्वक दुर्लक्ष केलं.
अन् एके दिवशी
जे नको व्हायचं तेच झालं
अपघातांची मालिकाच सुरु झाली.
कसं सांगु,
अजुनही गुंजताहेत त्या आरोळ्या कानात,माझ्या अंगावर पडलेलं रक्त अजुनही त्याचा ओलावा जाणवतोय.
मी चांगला झालो हीच माझी चुक होती का?
यंत्र कोणतच चुकत नाही,माणुस चुकतो हो,जीव गमावतो.
तरीही माझ्याच नावाने दोष
हा रस्ता दुवाड बनलाय,मृत्युचं दार बनलाय.
सांगा,माझं काय चुकलं ?
-----------------------------------------------------------------------
- एकनाथ लक्ष्मण गोफणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपलं मत