तडवी बोलीचा अनमोल ठेवा रमजानभाऊंचा कथासंग्रह 'रानमेवा'.
आम्ही लहानपणी शिकत असताना आम्हाला बाबूलाल रसुल तडवी या नावाचे गुरुजी आमच्या तांड्यात शिकवायला होते. त्यांच्याशी बोलताना आम्हाला मजा वाटायची आणि ते जेव्हा मित्रांशी बोलायचे तेव्हासुद्धा ते ऐकण्यात आम्हाला आनंदच वाटायचा.. कारण त्यांची तडवी भाषा होती. तडवी बोली भाषा, आम्हाला आवडायची आणि त्यामुळे या भाषेविषयी बोली भाषेविषयी मला इयत्ता तिसरी पासूनच आकर्षण होतं. नंतर या बोलीचा अधिक जवळून संबंध आमचे साहित्यिक मित्र रमजान गुलाब तडवी यांच्याशो वेळोवेळी चर्चा करत असताना. साहित्य संमेलनातील किंवा साहित्यिक या कार्यक्रमातील भेटीगाठी तून अधिक संबंध आला.
आणि मग रमजान भाऊंच्या तडवी बोलीतील . युट्युब चॅनेल साठी सुद्धा त्यांच्या कथांचे वाचन केलं आणि मला मजा आली . जवळीकता साधता आली नंतर 'खान्देशी रेडू' साठी रमजान भाऊंची तडवी बोलीतील साहित्य या विषयावर मुलाखत घेत असताना बोलीचे विविध पैलू मला समजत गेले. रानमेवा हा कथासंग्रह प्रकाशित झाला खूप संवेदनशील पद्धतीने आणि सामाजिक जाण असलेले लेखन रमजान भाऊ यांच्या लेखनात दिसून येतं.
या कथासंग्रह मध्ये एकूण अकरा कथा आहेत. तडवी बोलीत लिहिलेल्या कथांचा मराठी अनुवाद सुद्धा दिलेला आहे. कुदरत , मुक्ती हसनुर भाभी, पहिली भेट, कुटुंब नियोजन, ताटातूट ,कंदाची पंगत , पाहुणचाराची वाट, पिठाया चांगला, फरिस्ता अनं कहानीकार, मुक्काम या कथा सदर संग्रहात आहेत. तडवी बोलीभाषा आदिवासी भिल्ल समाजाची बोलीभाषा आहे.संमिश्र जीवन पद्धती जगण्याच्या त्यांच्या कृतीबद्दल लेखक म्हणतो , 'आदिवासी तडवी भिल्ल हे मिलीजुली रहेनी पायतं हती' .
बोलीतील कथा , शेती ,माती, शेतमजुरी या मुख्य बिंदूपासून सुरु होतात.
कुदरत या कथेतून निसर्गचक्र ही सगळी घटना त्यांनी यामध्ये मांडलेली आहे मजुराच्या मनाची दोलायमान स्थिती या कथेमध्ये दिसून येते.
'पेरणा, उंगणा, संभालना, कमावणा, खाना, जगणा अनं आदिक पेरणा या जिंदगीची चक्रात अख्खा गाव गुतायेल होता'.
निसर्गातून, गावाच्या मातीतून पुढे आलेलं एक व्यक्तिमत्त्व. अनेक प्रकारच्या हाल-अपेष्टा सहन करुन. शिक्षण घेऊन विविध भाषांशी, विविध परिसराशी महाराष्ट्राच्या विविध भागात प्रशासकीय विभागांमध्ये नोकरी करत असताना वेगवेगळ्या भाषांची व बोली मध्ये राहून सुद्धा रमजान भाऊ आपली मूळ बोली भाषा तडवी बोली विसरले नाही. तर तिला समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहिले आणि त्यांच्या या प्रयत्नांचाच भाग बोलीला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेलं हे अतुलनीय कार्य त्यांच्या रानमेवा या कथासंग्रहातून आपल्याला दिसून येते.
कथांमध्ये त्यांचा परिसर आलेला आहे. जगण्याची वास्तवता. स्त्रियांच्या व्यथा, बालकांच्या व्यथा कथा आणि भविष्यात त्यांच्या साठी काय करायचं या सगळ्या गोष्टी वाचकांना खिळवून ठेवतात. रमजान तडवी यांच्या लेखनामध्ये सामाजिक जाणीव दिसते संवेदनशीलता दिसते. त्यांच्या अनेकविध कथा या आपल्या परिसराला उभं करत असतात .
या कथेच्या माध्यमातून सातपुड्याचा परिसर दिसतो. आहे त्या जंगलाचा भाग तिथला सगळा परिसर तिचं जगणं जगण्यातली वास्तवता. इथलं लोकजीवन राहणीमान तिथल्या तिन्ही ऋतूतील मधली स्थिती हे या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे.
रमजान तडवी यांची प्रत्येक कथा ही निसर्गाशी तादात्म्य पावते . उकाड्याने हैराण झालेली गावकऱ्यांची व्यथा असो मजुरांची कथा असो हे सगळेच त्यांच्या कथेमध्ये येतात .चिकित्सक पद्धतीने अगदी बारीक-सारीक घटना जशाच्या मांडलेल्या आहेत. जे अनुभवले ते शब्दबद्ध केले.
कथा हा साहित्याचा एक प्रकार लेखकाने उत्तम प्रकारे मांडलेला आहे. . आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी रमजान तडवी यांच्या कथा संपन्न आहे.
अनेकत्वातून एकत्व व्यक्त करण्याची कला रमजान तडवी यांच्या कथेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
ज्या घटना घडल्या ज्या स्थळी काळी घडल्या तो
त्यांच्याशी संबंधित ती सर्व पात्रे ,स्थळकाळ व त्या घटनांशी संबद्ध अशा भाववृत्तीचे चित्रण या कथासंग्रहातून दिसतं. स्वाभाविकपणे निश्चित झालेली निवेदनशैली कथासूत्र व , पात्र तसेच घटनांच्या परस्परसंबंधांतून निर्मित संघर्ष, गुंतागुंत वाचकांना सत्यतेकडे घेऊन जातो. रानमेवा कथासंग्रहाच्या सर्व कथांचा उत्कर्षबिंदू ,मध्य व अंत परस्परसंबंधांतून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोणातून केलेले चित्रण दर्शवितात.
'हसनुर भाभी' कथेतील लढवय्या स्त्री ची व्यक्तिरेखा दिसते.'कुदरत' कथेतून शेतमजुरी व निसर्ग संतुलन व निसर्ग व मानव यांच्या विषयी नवी जाणीव दिसते. 'मुक्ती' कथेची मांडणी शेतमजुरांचं जगणं, संघर्ष व लेखकाने केलेले शिक्षण, नोकरी साठी संघर्ष व व्यसनाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या मजुराच्या कुटुंबातील वास्तव चित्रण करते. 'पिठाया चांदना' कथा त्या काळातील रेडीओ च्या आठवणींचा धांडोळा वाचकांसमोर आणतो.शहराच्या झगमगाटाकडून पिठूर चांदणं अनुभवायला घेऊन जातांना, हळुवारपणे नैतिकेचा धडा शिकवून जाते.
रानमेवा कथासंग्रह, बोरखेडा, सातपुडा, तेथील निसर्ग, नोकरी व जगणं, आदिवासी तडवी समाजातील वास्तव, तडवी, तडवी बोलीचे शब्द, म्हणी सांभाळून संवेदनशीलता जपतो. कुमुद पब्लिकेशन यांनी रमजान गुलाब तडवी यांचा रानमेवा हा तडवी बोलीच्या मराठी अनुवाद असलेल्या कथांचा कथासंग्रह प्रकाशित केलेला आहे. मुखपृष्ठ सुद्धा निसर्ग चित्रण करणारं आहे. तर रमजान गुलाब तडवी यांच्या बोलीला जतन आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा पहिला भाग म्हणजेच 'रानमेवा' हा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहाचे माध्यमातून साहित्य शिवारात पडलेल्या रमजान तडवी यांच्या प्रथम पाऊलांचा हा प्रवास त्यांना साहित्य समृद्धीकडे घेऊन जाईल. शेतमजुरी करणारा रमजान भाऊ, संघर्ष करत असताना 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. कथालेखक लवकरच डॉ.रमजान तडवी म्हणून नावारुपाला येणार आहे.
अनेक साहित्यकृतीचे मुखपृष्ठ आपल्या कुंचल्याने सजविणारे चाळीसगाव येथील चित्रकार, कवीमित्र दिनेश चव्हाण यांनी कथासंग्रहाला साजेसं व समर्पक मुखपृष्ठ बनवले आहे. कुमुद पब्लिकेशन चा 200₹ मुल्य असलेला असा हा
तडवी बोलीचा अनमोल ठेवा रमजानभाऊंचा कथासंग्रह 'रानमेवा
या कथासंग्रहाचे वाचक स्वागत करतीलच.रमजान तडवी यांच्या तडवी बोली जतन व संवर्धन करण्यासाठी सुरु असलेल्या साहित्यसेवेस हार्दिक शुभेच्छा.
🌹⚘⚘🌈🌈✍एकनाथ गोफणे
--------------------------------------
संघर्ष, वास्तव चित्रण व सूक्ष्म निरीक्षणातून जगण्याची धडपड मांडणारा प्रा.डॉ.युवराज पवार यांचा
कथासंग्रह 'शिकार'
_____________________________
कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान 🌼 तर्फे 🏆शिकार कथासंग्रहास -राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. डॉ.युवराज पवार सरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐💐
कथासंग्रहाचा परिचय वाचा 👇
संघर्ष, वास्तव चित्रण व सूक्ष्म निरीक्षणातून जगण्याची धडपड मांडणारा प्रा.डॉ.युवराज पवार यांचा
कथासंग्रह 'शिकार'
शिरपूर जि.धुळे येथील महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार यांच्या आठ कथांचा समावेश असलेला 'शिकार' हा कथासंग्रह .
चेतक बुक्स (पुणे) यांनी प्रकाशित केलेला आहे.
यामध्ये
जुळी,पाल, रासुंडा, अंगठा ,शिकार ,परीक्षा, शाळा,
तांड्याची बाई
आठ कथांचा समावेश केला आहे.या कथा 2007 ते 2013 या कालावधीमध्ये मिळून साऱ्याजणी अक्षर वैदर्भी परिवर्तनाचा वाटसरू अस्मितादर्श,अक्षरगाथा आदी साहित्यिक प्रकाशनांमध्ये पूर्व प्रसिद्ध
झालेल्या आहेत .
वास्तव चित्रण शब्दात मांडतांना लेखकाने केलेले सूक्ष्म चित्रण या कथासंग्रहात वैशिष्ट्य म्हणावे लागेल या कथासंग्रह मध्ये ज्या कथा आहेत त्या भटक्या विमुक्त बंजारा समाजाच्या भटके-विमुक्त समाजाच्या व्यथा मांडत खूप सुंदर पद्धतीने त्यांच्या जगण्याला वास्तव शब्दांकन,सांस्कृतिक परिवेश देण्याचं कार्य लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे .
बंजारा लोक जीवनातील हा एक सुंदर असा सांस्कृतिक खजिना या कथासंग्रहाचे निमित्ताने मराठी साहित्यात आलेला आहे. यामध्ये स्वतःची गोरबोलीली भाषा,
बंजारा लोकजीवनातील ,बोलीभाषेतील शब्द आहेत.
यामध्ये विद्रोह आहे. यामध्ये नायकचं ऐकून ,जी एकजूट लोक दाखवतात आणि एका प्रस्थापित पुढाऱ्याला तांडा कसा हरवतो हेही याच्यामध्ये दिसून येतं.
या विविध कथासंग्रह मधून कथांमधून प्रगतीची वाट पुरोगामित्वाकडे वाटचाल ही दिसून येते.
या कथा वाचत असताना एक चित्र डोळ्यासमोर येतं.
लेखकाच्या लेखन कौशल्याचा अनुभव वाचकांना येतो.
प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार यांनी कथासंग्रहात वेगवेगळ्या कथा लिहिलेल्या आहेत.
हे अनुभवसिद्ध आहे आणि यामध्ये त्यांनी बंजारा लोकजीवन त्या बंजारा लोक जीवनाच्या जगण्याचं अतिशय वास्तववादी सूक्ष्म चित्रण त्यांनी या कथासंग्रह मध्ये केलेला आहे .
तांडा व तेथील लोकजीवन कशा पद्धतीने वाटचाल करत असतात हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जुळी कथेतील वास्तव चित्रण त्यासोबत घरातील कर्त्या पुरुषाला कामानिमित्त बाहेर जावं लागतं. स्त्रीला सुद्धा उदरनिर्वाहासाठी , एवढ्या उन्हात फिरावे लागते
बंजारा कुटुंबातील गरीबी, त्यातून होणारा संघर्ष, सिंधू, सुदाम, गीता, यांच्यातील चर्चा, मध्येच येणारी गोरबोलीतील संवादमाला, त्यांच्या मुलींचं जीवन तसेच तांड्याची आरोग्य सुविधेची परवड व त्यातही
नंतर जुळ्या मुली होतात.व बाप त्यांचा स्विकार करुन तांड्यातल्या व्यक्तीची सकारात्मक प्रतिसादाची कृती 'सुदाम' ही व्यक्तीरेखा यातून दिसते .
'पाल' या कथेतून भटक्या जमाती पैकी असलेल्या एक फासेपारधी समाज ,स्त्रीयांच्या ,हालाखीच्या जीवनाचे चित्रण या कथेत केलेला आहे.
तिथुर, लाव्हऱ्या विकणाऱ्या बाईची कथा आहे.
'रासुंडा' या कथेत तांड्यातला रामा नाईक हा शेतकरी,त्यांची शेती व नवस यात अडकलेली स्थिती, मनाची तगमग,पत्नी शांता च्या मनाची, घालमेल.गजू व दिलू या दोन्ही मुलांची स्वभाववैशिष्टे असलेली कथा.
रासुंडा म्हणजे नवस .व त्याला पूर्ण करण्यासाठीची धडपड व शेतीची चिंता .बापाची तगमग ओळखून परिवर्तनाकडे जाणारा दिलू हा मुलगा. या कथेतून दिसतो.
'अंगठा' याकथेतुन शिवा नाईकच्या सुनबाई सुलीला सर्पदंशाने होणारा त्रास व सरपंच, आमदार यांच्या राजकिय दंशाची व्यथा याच चित्रण केले आहे.
'शिकार' कथा खूपच सुंदर पद्धतीने घेण्यात आली आणि त्यावरूनच या कथासंग्रहाचे नाव 'शिकार' हे देण्यात आलेलं आहे .
तुकाराम सह सुरेश, व रानडुक्करच्या शिकारीची कथा.सुंदर गुंफण केली आहे.
प्रा.डॉ.युवराज पवार यांच्या कथेत गोरबोली व तावडी बोली एकत्रित आल्याने वाचतांना वेगळाच आनंद होतो.बंजारा गोरबोलीतील अनेक शब्द व म्हणी या कथासंग्रहामुळे मराठी साहित्यात आल्या आहेत.
'परीक्षा' कथेतील हरी या बापाचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी संघर्ष करणारी, 'बा' चं प्रेत घरात असुनही
डोळ्यात आसवं आणि हातात रिसीट, पेन, कंपास पेटी, फुल पट्टी अन् पॅड घेऊन परीक्षेला जाणारी 'बा' चं स्वप्न पूर्ण करायचं ,प्रत्येक कसोटीला खरं उतरायचं असं ठरवत आयुष्याची परीक्षा द्यायला निघालेले दिपाली मुलगी दिसते.
'तांड्याची बाई' या कथेमध्ये अनेक गोष्टींचा संघर्ष करत नायक सगळ्या गावाची वैचारिक बैठक घेतो .विचार करायला लावतो आणि कशा पद्धतीने ती तांड्याची बाई सरपंच होते . त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय याच्या विरोधात सरपंच म्हणून जमिनीतून वनिता नावाची एक वेल अंकुरते हे कथा वाचतांना दिसून येते.
खूपच सुंदर असा हा कथासंग्रह.
प्राध्यापक डॉक्टर युवराज पवार यांनी लिहिलेल्या कथांचा आहे. भविष्यात विविधांगी विषय घेऊन असंच आगळंवेगळं लेखन मराठी साहित्यात त्यांनी लेखन करावं.सोबतच गोरबोलीत व तावडी भाषेतही स्वतंत्र कथासंग्रह प्रकाशित करावा.
कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान 🌼 तर्फे 🏆शिकार कथासंग्रहास -राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा. डॉ.युवराज पवार सरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐💐
✍ एकनाथ गोफणे
----------------------------------------------
विविधांगी शैक्षणिक उपक्रमांचा खजिना म्हणजे राजेंद्र वाघ यांचे 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' हे पुस्तक....

'आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ,परिपूर्णतेचा ध्यास घेतलेले प्राथमिक शिक्षक राजेंद्र भाऊराव वाघ ,या उपक्रमशिल आणि धडपड्या तरुण शिक्षकाने त्यांच्या वर्गातील विद्यार्थी 'प्रतिभावंत' बनावेत या हेतुने केलेले शैक्षणिक कार्य, शिक्षण आनंददायी करणारे , विद्यार्थ्यांची निरिक्षण शक्ती व आत्मविश्वास वाढविणारं, सहजता, चिकित्सक वृत्ती जोपासायला लावत, कल्पकता व श्रमाचा आनंद देत शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया वाढविण्यासाठी एकत्रित स्वरुपात शब्दबद्ध केलेल्या विविधांगी शैक्षणिक उपक्रमांचा खजिना असलेले म्हणजे
'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' हे पुस्तक आहे.कोविड १९ काळातील पुस्तकाचे प्रकाशन, जेष्ठ शिक्षणतज्ञ ,माजी शिक्षण संचालक डॉ.वसंत काळपांडे यांच्या हस्तेऑनलाईन झाले असुन ATM प्रकाशन कर्जत,अहमदनगर.प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ गजानन सुरकुटवार,नांदेड कल्पनने यांच्या आकर्षक बनले आहे .श्रेयशी ग्राफिक्स, पुणे यांनी अक्षर जुळवणी उत्तम प्रकारे केले आहे. 'उपक्रमांच्या नावात यमक साधल्यामुळे रंजकता वाढलेली आहे'. शिक्षक, पालक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
जळगाव जि. प. अंतर्गत सध्या चाळीसगाव तालुक्यातील जि.प.उच्च प्राथ.शाळा शिंदी
ता.चाळीसगाव जि.जळगाव या शाळेत सध्या श्री. राजेंद्र वाघ सर कार्यरत आहेत. याआधी टाकळी प्र.चा येथिल शाळेमध्ये ते कार्यरत असतांना केलेले शैक्षणिक उपक्रम त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत . त्या पन्नास उपक्रम 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' या पुस्तकात आहे.
उपक्रम भाषा ,विज्ञान ,गणित ,कला ,कार्यानुभव संगीत या विषयावर आधारित आहेत. पर्यावरण पुरक असं सहज उपलब्ध होणार व पूनर्वापर प्रक्रियेस हातभार लागेल असे साहित्य या उपक्रमात त्यांनी वापरले आहे. हे एक वेगळंपण ठरतं. विद्यर्थ्यांंमध्ये रममाण होणारा शिक्षक यात आपणास दिसून येतो.
अक्षर बनवूया डाळींचे, संख्या क्रम लावूया
ओळखा पाहू काय माझ्या टपाल पेटीत माझे नाव.
ठोकळे जोडूया पक्षी बनवूया.
आवडती क्लिप पाहूया त्वरित वर्गात येऊया.
मुक्त वाचन कट्टा
शब्द दाखवूया माहिती देऊ या.
जत्रेला जाऊ या संख्या जिंकूया. आदी उपक्रम यात आहेत.हे उपक्रम सहज करता यावेत म्हणून त्यांनी खूपच सुटसुटीतपणे आणि एकाच पानावर
कमी शब्दात जास्तीत जास्त आशयाची मांडणी असलेलं लेखन केलेलं आहे. त्यामध्ये
उपक्रमा साठी लागणारे साहित्य त्याची कृती दिलेली आहे. संदर्भात त्यांनी आपल्या मनोगतात राजेंद्र वाघ यांनी आठवण लिहिलेली आहे. की जळगाव जिल्हा परिषदेने सुरु केलेल्या एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांतर्गत विविध अधिकार्यांच्या पथकाने जेव्हा त्यांच्या शाळेला भेट दिली त्यावेळी त्यांच्या उपक्रमातील सहभाग कृती पाहून पथकात शिक्षण विभागातील अधिकारी आले होते आणि त्यांनी सूचित केले की तुम्ही केलेले उपक्रम शब्दबद्ध केले तर इतर शिक्षकांनी प्रेरणा मिळेल. या प्रेरक सुचनेतुन प्रेरित होत राजेंद्र भाऊराव वाघ ,या उपक्रमशिल आणि धडपड्या तरुण शिक्षकाने वर्गाच्या चार भिंतीत केलेले व युट्युब समाज माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या उपक्रमांचे एक सुंदर पुस्तक 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' प्रसिद्ध केले ही उल्लेखनीय बाब आहे. पुस्तक प्रकाशन पूर्वी त्यांनी शैक्षणिक विषयांवर अनेक लेख विविध वृत्तपत्रांमध्ये लिहिलेले आहेत . दैनिक लोकमत मधील कला संस्कृती, हॅलो
डॉक्टर विज्ञान वार्ता,प्रतिबिंब, अर्थ,उदयोग वाणिज्य आणि धार्मिक आध्यात्मिक इ.सदरात
शैक्षणिक, सामाजिक स्वरूप असे आहे असे ४२ लेख प्रसिध्द
आहेत. लेख सदरात प्रसिध्द झाले होते.त्यांच्या
शैक्षणिक कार्याची दखल घेऊन २०१७
मध्येजि.प.आदर्श शिक्षक पुरस्कारासह, महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार १६
डिसेंबर २०२०,राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई - पुरस्कार २०२० त्यांना मिळाले आहेत. भविष्यात श्री राजेंद्र सरांनी आपल्या वर्गातल्या
विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या अभिव्यक्तीवर आधारित
कृती व बालकवितांचे पुस्तक प्रकाशित करावे. 'माझे ज्ञानरचनावादी उपक्रम' हे पुस्तक प्रसिद्ध
केल्याबद्दल लेखक -श्री.राजेंद्र
भाऊराव वाघ सरांचे हार्दिक अभिनंदन व आगामी काळात आंतरराष्ट्रीय ,राष्ट्रीय पातळीवर त्यांचा पुस्तकरुपी उपक्रम
जावो हीच त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.


99601 25494 धन्यवाद
स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त, गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र
'हसत-खेळत शिकूया'
प्राथमिक शिक्षक म्हणुन स्थानिक स्वराज्य संस्था,जि.प.जळगाव अंतर्गत ग्रामिण भागातील प्राथमिक शाळेत कार्यरत राहून
विविधांगी उपक्रम राबवून , शिकणं व शिकवण्याची सुयोग्य गुंफण करुन ,उपक्रमशील आणि प्रयोगशिल शिक्षक म्हणून राज्यभरातील शैक्षणिक क्षेत्रात नवी ओळख निर्माण करणारे,विद्यार्थीप्रेमी शिक्षक अरुण पाटील यांनी खास विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त, गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र
'हसत-खेळत शिकूया'
या पुस्तकाची निर्मिती केली आहे.हे पुस्तक नावाप्रमाणे खूप सुंदर आहे.एटीएम प्रकाशन यांनी 2019 मध्ये प्रकाशित केलेली ही प्रथमावृत्ती का.स.वाणी संस्था धुळे यांनी मुद्रीत केली आहे .
या पुस्तकाची प्रस्तावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि ए.टी.एम.चे राज्य संयोजक यांनी दिलेली आहे
विक्रम अडसूळ यांनी लिहीली ही जमेची बाजू आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाचन-लेखन निर्णय अपेक्षित आहे आणि ते ज्ञान अवगत करण्यासाठी अरुण पाटील यांनी तयार केलेला आहे एकूण 58 पानांचे हे पुस्तक तयार केले आहे .
त्याच्यामध्ये खूप मजेशीर संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत.
चित्रातून शब्द वाचण्याची सोय आहे, वाचा व लिहा, शब्दांची बाग त्यासोबत अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी छोट्या-छोट्या शब्दांमधून शब्द कृती तयार करण्यासाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे.
मुळाक्षरां पासून तयार होणारे शब्द.
बाराखडीची ,चौदाखडी झाली .
ती चौदाखडी सुद्धा स्वतंत्रपणे त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे. शब्द दिलेले आहेत जोडाक्षरी शब्द एकूण सहा पेजवर त्यांनी दिलेले भरपूर पद्धतीचे जोड शब्द कृतीयुक्त सरावासाठी दिलेले आहेत.
समानार्थी शब्दांचा ही एक समूह आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, घर दर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द ,शब्द समूहाबद्दल शब्द, त्यासोबत पिल्लू दर्शक शब्द, म्हणी आणि त्यांचे अर्थ त्यासोबत अंकांची ओळख 1 ते 9 या अंकांची ओळख चित्रातून आणि संख्या नामातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
1 ते 100 पर्यंतचे अंक स्वतंत्र रकान्यात आणि ठळकपणे याठिकाणी त्यांनी दिलेले आहेत.
2 ते 10 पर्यंत चे पाढे, अकरा ते विस पर्यंत चे पाढे, 21 ते 30 पर्यंतचे पाढे दिलेले आहेत .
त्याच सोबत या पुस्तकामध्ये पान नंबर 56 वर अक्षर शब्द लेखनाचा , वाक्य लेखनाचा सराव विद्यार्थ्यांना नियमित फळे करता यावा यासाठी ओळीसाठी एक स्वतंत्र कोरे पेज दिलेला आहे.
उजळणी पाढे लेखनाचाही
पुस्तकातून सराव व्हावा म्हणूनही हे एक स्वतंत्र चौकट असलेला रकाना एका पेजवर दिलेला आहे आणि प्रजासत्ताक दिनाची माहिती सुद्धा त्यांनी दिलेले आहे हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याने त्यांच्या कल्पनेला वाव देण्याचे काम करणार आहे.स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त, गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र म्हणजे 'हसत-खेळत शिकूया' होय.
भविष्यात अरुण पाटलांनी आपल्या बालकवितांचा व बोधकथांचा संग्रह तयार करावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य संदर्भात आलेले अनुभव याच्या संदर्भात सुद्धा स्वतःचा अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कृतीं या अनुभवाची सुद्धा एक पुस्तिका काढावी.
त्यांनी इंटरनेटवर लिहिलेली मराठी भाषेतील अनुदिनी म्हणजे, त्यांचा 'तंत्रगुरु' हा ब्लॉग सुद्धा, त्यांच्या कौशल्यात्मक कार्याला समाजासमोर आणतो ..
सध्या पिंपळगाव बु ता.भडगाव येथिल जि.प.शाळेत कार्यरत असलेले ,अरुण शिवाजी पाटील यांच्या लेखनासह ते शिक्षक म्हणुन करीत असलेल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
------------------------
लेखन:-एकनाथ गोफणे
======================================
परिवर्तनाची हाक देत आठवणी जागृत करणारा श्रीकांत पवार यांचा काव्यसंग्रह
कांयी कू गोरुर साकी
डोंबिवली येथे मार्च 2018 मध्ये संपन्न झालेल्या पाचव्या अखिल भारतीय बंजारा संमेलनात कवी श्रीकांत पवार यांच्या
कांयी कू गोरुर साकी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.परिवर्तनाची हाक देत आठवणी जागृत करणारा हा काव्यसंग्रह आहे.
कवी श्रीकांत पवार हे यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सामान्य प्रशासन विभागात त्यांनी सेवा केली आणि 2009 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. ध्यास कवितेचा मंच बोरिवली याचे ते सदस्य आहेत.
त्यांचे अनेक लेख कविता गझल हे प्रकाशित झालेले आहेत. 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसेच 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सह 15वे आगरी सांस्कृतिक साहित्य संमेलन डोंबिवली येथे सुद्धा त्यांनी
त्यांनी आपल्या कवितांचं सादरीकरण केलं आहे .
कवी श्रीकांत पवार यांच्या कवितेचा काळ हा 60 च्या दशकातला त्या काळातला बंजारा समाज त्यांची बोली भाषा संस्कृती चालीरीती आणि आजचं वास्तव जीवन , तांड्याचं दुःख त्यांनी या काव्यसंग्रहात मांडलेलं आहे .
एकूण ५३ वेगळ्या प्रकारातील गोरबोलीभाषेतील कवितांचा हा काव्यसंग्रह आहे.
यामध्ये निसर्ग व माणुसकी आहे .संस्कृती व परिवर्तन आहे.आठवण आहे बंजारा गोर बोलीभाषेत हायकू या प्रकारात सुद्धा श्रीकांत पवार यांनी लेखन केलेलं आहे. गोरबोली भाषेतील विविध शब्दांचे ज्ञान करुन देत, मानवी जीवन परिवर्तन कवितेतून मांडण्याचा प्रयत्न काव्यसंग्रहात केलेला आहे.
आधुनिक काळात वेगवेगळ्या भूलथापांना मध्ये आम्ही जीवनाचा आनंद कसा विसरलोय, माणसाची एवढी गर्दी आहे तरीसुद्धा माणूस एकटाच आहे हे सांगणारी त्यांची जगेर हवा ही रचना खूप काही सांगून जाते.
गोरबोलीभाषेत दुःख सांगणारी 'काल म देको' ही रचना आहे.
आशावाद जागृत करणारी उंच भरारी घ्यायला लावणारी 'मनक्या'
ही कविता निसर्ग प्राणिमात्रांची उदाहरण देत स्वतःला सुद्धा समृद्ध करण्याचा ध्यास प्रत्येकाने घ्यावा असं सांगते.
मार लिदे भरारी
भरोसो पकोडाप
लिदे जिम्मेदारी तो
वाट मळ आपोआप
या शब्दातून उंच भरारीचा आशावाद त्यांनी मांडलेला आहे .
'वो दन' या कवितेतून त साठच्या दशकातली त्यांचं जीवन , तांड्याची स्थिती आणि वृक्षाची आठवण देखील मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर सोबतच वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अधोरेखित करणारी रचना सुद्धा ह्या काव्यसंग्रह मध्ये आहे
परिवर्तनाची हाक देणारी आणि अनेकांच्या मनामध्ये घर करून राहिलेली त्यांची 'दुनिया बदलगी' ही कविता आज परिवर्तनाचं गाणं म्हणून बंजारा समाजात आनंदाने गायीली जाते व ऐकली जातेय.
तांड्याचा संदर्भ बंजारा एकदा निसर्ग मारोळी नावाची कविता शब्द सौंदर्याने सजलेली आहे
परिवर्तनाची हाक देणार आहे एकत्र आणणारा जागृतीचा संदेश 'नंगारा' या कवितेतून दिसून येतो. शेतकऱ्यांचं दुःख मांडून त्यांना आधार देणारी 'मत व जीवेपं उदार' नावाची कविता शेतकऱ्यांना एक आधार देणारी आहे ,'कर्ज फिट जायेरे,आज ना सवार 'असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात जागृत करणारी ही रचना आहे
त्यांनी 'हायकू' प्रकारात सुद्धा या काव्यसंग्रहात काव्यलेखन केलेलं आहे.त्यासोबत बंजारा लेंगी गीतातून केसुला चे उपयोग, आणि होळी लेंगी प्रेमगीत काव्यसंग्रहात आहे.
परिवर्तनाची हाक देणारा आणि आठवणी जागृत करणारा त्यासोबतच बंजारांच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गोरबोली भाषा समृद्ध करणारा 'कांयी कू गोरुर साकी' हा काव्यसंग्रहआहे. श्रीकांत पवार यांच्या लेखन कार्यास एकनाथ गोफणे तर्फे हार्दिक शुभेच्छा .
******************************************
तांड्याचं संघर्षमय जगणं गोरबोलीत प्रभावीपणे मांडणारी
भरकाडी.
मराठी साहित्यामध्ये भरकाडी नावाचा कथासंग्रह डॉक्टर गणेश चव्हाण यांनी प्रकाशित केलेला आहे डॉक्टर गणेश चव्हाण हे संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा नागपूर या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा भरकाडी हा कथासंग्रह यामध्ये एकूण नऊ कथा आहेत आणि दहावी कथा आहे ती गोरबोली भाषेत त्यांनी लिहिलेली आहे भरकाडी नावाची कथा आहे ती बोली भाषेत त्यांनी लिहिलेले आहे या कथासंग्रहातील संपूर्णतः व्यक्तिरेखा आहेत या बंजारा तांड्याचं चित्रण दर्शवितात. बंजारा तांडा या कथासंग्रहाचे निमित्ताने मराठी
साहित्यात आला. तांड्यातला येडा आणि ती ,एक कळी कुस्करलेली,
ढोंगी देम्या,खेळ भातुकलीचा, लग्न एक जुगार, वनाई, उलंगलेली जीवनवाडी,जगण्याने छळले होते.या मराठी कथा आणि त्यासोबत भरकाडी या कथेचं गोरबोली भाषेत लेखन केले आहे.या कथासंग्रहात मराठी , व-हाडी बोली गोरबोली आणि हिंदीतले संवाद हे कथेत रस वाढवतात वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या कथांमध्ये आहे .या कथासंग्रह मध्ये वेदना आहे,कारुण्य आहे, विरह आहे, प्रेम आहे मैत्री आहे , नाट्य आहे त्याच सोबत वाद आहेत यश आहे न्याय-निवाडा संघर्ष रोजगारासाठी भटकंती त्याच्यासोबत सरकारचे धोरण, पुतळे उभारण्यासाठी सरकार तर्फे हेणारा खर्च आणि शेतकऱ्यांच्या व्यथा.शेतकऱ्यांच्या मालाला भाव आला की लगेच महागाई वाढते , वृत्तपत्रांमध्ये त्याची दखल घेतली जाते, कृषी मंत्रालय शेतकऱ्याची व्यथा समजून घेऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांचा विषयावर कसे राजकारण चालू आहे हे स्पष्टपणे मांडण्याचा,'तळागाळाचा,या मातीचा' विचार करण्याचे सामर्थ्य या कथासंग्रहात आहे.
लेखक प्रा.डॉक्टर गणेश चव्हाण यांनी कथासंग्रहाच्या माध्यमातून विविध बंजारा तांडे आणि त्यात जगणारे लोकं, कथानायक म्हणून आलेला बंजारा माणूस याठिकाणी उभा केलेला आहे .व्यंकटेश , संयोगिता आणि नरेश हे पात्र असतील त्यासोबत तोळा नावाच्या माणसाची होणारी परवड ,सासर आणि माहेर दोन्ही बाजू सांभाळत होणारा आघात मन सुन्न करुन जातो.चिटुरवाला त्याचं परीवरचं प्रेम, शिक्षण संस्था चालकाने गळ घातलेली पोरगी, नोकरीसाठी होणारी तडजोड व त्यातून जीवन भरकाडी जमिनी सारखे कसे असते हा संघर्ष मनाला चटका लावून जातो.
वडांगळी व पोहरादेवी हे दोन्ही बंजारा समाजाची धार्मिक स्थळे या निमित्ताने या कथेचे आलीत.या कथासंग्रहात मांडवा तांडा,गोविंदपूर तांडा,आणि जुनपाणी तांडा हे बंजारा तांडे प्रामुख्याने दिसून येतात.मामा आणि बंडू यांची जोडी आणि तर्री खायची रस्सा खायची ही गोष्ट या कथासंग्रहातून वाचतांना वास्तवतेकडे नेते.त्यासोबत बंजारा समाजातील अनिष्ट हुंडा पद्धत आणि बापाचं कर्जबाजारीपणा या विषयावर भाष्य करते ,नक्षलवादी भागात होणारी मुलाची पोस्टींग व त्या भीतीपोटी रात्रभर चिंतेत राहणारे त्याचे आई वडील,आदिवासी शिक्षणाची व्यथा व ती सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्याचे हाल व यातून त्याची आपल्या तांड्याकडे परतण्याची तयारी, तसेच उच्चशिक्षित माणसाची सुद्धा कशी परवड होते, हे 'तोळा' च्या व्यक्ती रेखेतून दिसते.तांड्याचं दु:ख मांडताना येथिल आरोग्य सेवा कशी आहे हे सांगताना लेखकाचे कौशल्य दिसते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा, तांड्यात शिरकाव करणारी सावकारी पद्धत, देम्याचा आळशी स्वभाव व त्यातून निर्माण होणाऱ्या घटना सोबत सरोजचं स्त्री सौंदर्य वर्णन लेखकाने अप्रतिम रेखाटले त्याचसोबत व्यंकटेश च्या चिठ्ठी ची गंमत,मनाची घालमेल अचुक टिपलेली दिसते.बदनामी च्या भितीने त्रस्त झालेली आई सामाजिक व्यवस्थेची स्थिती दाखविते. अवैध होणाऱ्या जंगलतोडीमुळे होणाऱ्या घोटाळ्यावर कथासंग्रह प्रकाश टाकतो.सदर कथासंग्रहास बंजारा साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नाईक यांची प्रस्तावना लाभली आहे. नागपूर च्या 'राघव'प्रकाशन मार्फत अप्रतिमपणे कथासंग्रहाची मांडणी करण्यात आली आहे. उज्वल क्रिएशनने मुखपृष्ठ सुंदर केले आहे.भरकाडी अनेकविध पुरस्काराने सन्मानित होवो. गोरबोलीत त्यांनी अजून स्वतंत्र साहित्य निर्माण करुन गोरबोलीस नवा आयाम देण्याचा प्रयत्न करावा.
डॉ. गणेश चव्हाण यांनी यांच्या आगामी साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
लेखक
एकनाथ गोफणे
----------------------
२
पुस्तक परिचय
कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ असलेला काव्यसंग्रह 'नात्यांच्या पलीकडले '
शब्द, शब्द आणिक
शब्दांची गुंफूनिया माळ
होते जरी कविता ....
आयुष्याच्या चढ _ उतरणीत
जीवन हे काव्य होऊनी जगावे.
असा सुंदर संदेश देत जगण्याची प्रेरणा देणारा 'नात्यांच्या पलीकडले '
हा कवयित्री रिता जाधव यांचा ६७ कवितांचा काव्य संग्रह म्हणजे मानवी मन , नातं, आयुष्य या सोबत कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ आहे. माणूस व माणुसकीतला प्रेमभाव हा कवितेचा स्थायीभाव आहे.
मुक्तछंदातल्या वाचक मनावर अधिराज्य करणाऱ्या कविता अनुभव सिद्ध आहेत.या काव्यसंग्रहाची व्यापकता फार मोठी आहे.निसर्ग , प्रेम , कर्तव्य , जीवनातील गंमत,कृतज्ञता , जगण्याची उमेद, पोलिस व लाठी , आई, आजी , मुलगी , बाप , कन्या , शेतकरी , पाऊस, भिकारी , व्यसनमुक्ती या सारखे अनेकविध विषयांनी या काव्यसंग्रहाला वेगळपण आलयं.जगण्याचं भाव व्यक्त करणाऱ्या,भावविश्वाशी नातं जोडणाऱ्या या कविता संग्रहातील कविता ,स्त्रीने जरी लिहिलेल्या आहेत तरी वाचतांना त्या एका व्यक्तीच्या आहेत म्हणजे स्त्री -किंवा पुरुष हा लिंगभेद नष्ट करुन एका व्यक्तीमत्वाची अभिव्यक्ती या काव्यसंग्रहातून दिसते. हे वाचतांना जाणवते.नाते संबंध व नात्यांच्या पलिकडचा जिव्हाळा यांचा सुंदर संयोग वाचकांना दाखविण्याचं कौशल्य या काव्यसंग्रहात आहे. प्रतिमा व प्रतिकांची सुयोग्य मांडणी काव्यसंग्रहाची ऊंची सांगते.
हा काव्यसंग्रह जगण्याचं गुपित सांगतो, संवेदनशिल बनवितो, कर्तव्यावर प्रेम करायला शिकवितो, मनात जाणिव व सहानुभूती निर्माण करतो.कवयित्रीने पोलिस सेवेतील प्रसंग, कर्तव्याची जाण व त्या अनुषंगाने आलेले बरेच अनुभव काव्यात्मक शैलीत मांडले आहे.
अनेक वेळा विविध आपत्ती व विकासाच्या नावाखाली मानवी जीवनाचं विस्थापन होतं. शासन यंत्रणा त्याचं पुनर्वसन करीत असतं पण त्या अवस्थेतील मानवी मनाची होणारी घालमेल आपल्या शब्दातून मांडतांना व्यवस्थेला पण जाब विचारण्याचं धाडस करणारी कविता वाचतांना पुनर्वासितांच्या मनाचे आंदोलन जाणवते.
'पूनर्वसन करतांना करता येईल का
आमच्या महत्त्वाच्या
बळी पडलेल्या क्षणाचं
की ह्या भेदरलेल्या मनाचं
पहा जमतय का
नाहीतर ,
आहे हेच जगणं '.....
ही जगण्याची व्यथा मांडून मानवी जीवनाची वास्तव स्थिती या
कर्तव्यपूर्तीचा आनंद हा प्रेरणादायी असतो. हे स्वत : पोलिस सेवेत कार्यरत राहून , अत्यंत चिकित्सक पणे व समाजाभिमुख साहित्य निर्मिती हे मुख्य अंग या संग्रहातून दिसतं.
शब्दगंध प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे
मुखपृष्ठ छान आहे.ज्यातून धरती व आभाळाचं नातं व त्या नात्यांच्या पलिकडच्या जाणीवांचा शोध घेण्यासाठी पुढे पुढे जाणारं स्त्री मन प्रतित होतं.
सहज गंमत म्हणून कवितेतून ' दारु ' चे दुष्परीणाम सांगणाऱ्या
'पोलादालाही वाकविण्याचं
सामर्थ्य असणाऱ्या माणसाला
हिनं पुरतं बधिर केला
खरं हाय मित्रा
दारु इकणाऱ्याने
बांधले असतील इमले,
पिणाऱ्यांन न्हाई
ह्याचा प्रत्यय
मलाबी आला '
या ओळीतून मार्मिक पणे व्यसनावर प्रहार करुन सामाजिक भान देण्याचं शब्दांचं सामर्थ्य समजतं.
'सेल्फी ' ही कविता स्वतःची चमकोगिरी करणाऱ्या
राजकीय क्षेत्राला समाजाचं व देशाचं वास्तव चित्रण दिसत नाहीहे सत्य सांगण्याचं कार्य करते.
'घरात लग्नाची लेक आहे
शेतावर कर्जाचा भार आहे
सीमेवरील जवानांचा श्वास
हरघडीला उधार आहे.
ह्या सेल्फीला
दिसत नाही वास्तव जीवन '.......
हा काव्यसंग्रह , सिग्नलची गोष्ट , खाकीची व्यथा , शेतातल्या रामकाठची कथा पण सांगतो. दादा कोंडकेंच्या कलेला पण आठवणीच्या रुपाने जपून ठेवतो, मुंबईच्या धकाधकीत आधार वाटणारी लोकल अन शेतकऱ्याच्या कार्याप्रती कृतज्ञ पण होतो.कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ म्हणजे नात्यांच्या पलीकडले हा काव्यसंग्रह आहे.
भविष्यात रिता जाधव यांनी , असाच एक समृद्ध काव्यसंग्रह गोरबोलीभाषेत प्रकाशित करावा ही वाचकांची अपेक्षा आहे. रिता जाधव -राठोड यांच्या लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा !
....................
लेखक - एकनाथ गोफणे
-------------------
३
पुस्तक परिचय
परिस स्पर्श .......
पालक पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी
मार्गदर्शन करणारी साहित्यकृती असून या पुस्तकाचा आज आपण परिचय करुन घेणार आहोत..
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. प्रविण दवणे यांनी परिसस्पर्श या साहित्यकृतीला वाचकांसाठी आणलय.
प्रकाशन ... हे पुस्तक नवचैतन्य या प्रकाशनाने सन डिसेंबर २०१५ मध्ये प्रकाशित केले आहे.
मुखपृष्ठ.. पुस्तकाचं मुखपृष्ठ फार आकर्षक आहे..
सूर्यासारखी झेप घेण्याचा आत्मविश्वास आपल्या मुलाच्या मनात निर्माण व्हावा, यासाठी त्याला स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारा बाप ...
असं हे उद्बोधक चित्र पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट मांडतं...
सदर चित्र पुंडलिक वझे यांनी रेखाटलं आहे..
लेखक परियय- ठाणे येथे 3५ वर्ष मराठीचे अध्यापन करणारे
सुप्रसिद्ध साहित्यिक
श्री. प्रविण दवणे हे वास्तवता मांडणारे , लेखक आहेत. संवेदनशिलता व मार्गदर्शकाची भूमिका हा त्यांचा लेखनाचा गुण आहे.
त्यांनी आत्ता पर्यंत _ कविता , गीतरचना , ललित गद्य , कथा , कादंबरी , नाटक अशा विविध वाड़्मय प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी आतापर्यंत ८ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भुषविलं आहे.
अंतरंग. परिस स्पर्श या पुस्तकात प्रविण दवणे यांनी एकूण १ ते ३२ वेगवेगळे विषय घेऊन लिहीलेल लेख संवेदनशील पालक - शिक्षकांसाठी पुस्तक रुपात मांडलेत.
आपल्या अध्यापनाचा विषय कुठलाही असो विद्यार्थांशी मैत्री करा. त्यांना बालपण अनुभवू दया असा सल्ला ते देतात.
एका प्रकरणात लेखक म्हणतात,
शाळांबद्दल अनास्था आणि घराबद्दल वाटणारं भय ही उद्ध्वस्त भविष्याची नांदी ठरु नये.
.. गैरहजर मुलांची ब्लॅक लिस्ट
भिंतीवर लिहील्या बद्दल रस्टिकेट नाही,
गृहपाठ नाही _ वर्गाबाहेर
मोबाईल वाजला - झडजप्ती हे उपाय नाहीत . या अशा चुका मार्गदर्शनाअभावी भरकटलेल्या मनांकडून अजाणात होतात.
अशा असंख्य गोष्टी सुसंवादाने सुखान्त होतात.
आक्रमक वाटणारीच खुप मुलं पुढं आपले जिव्हाळ्याचे दोस्त होतात.
कारण ऊर्जेचं दिशा शून्य गाठोडं आता योग्य दिशेनं वाहू लागलेलं असतं '
पालक व शिक्षकांसाठी आवश्यक हे पुस्तक सर्वांनी जरुर वाचावे व आपल्या गृह ग्रंथालयात आवर्जून संग्रही ठेवावे..
मलपृष्ठ.. परिस स्पर्श या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक प्रविण दवणे यांनी म्हटलयं ,
सकारात्मक उपक्रमशिलता हाच विद्यार्थी , शिक्षक आणि पालक या नात्याचा प्राणवायू आहे. जगावेगळी अपूर्व क्षमता अंगी असलेल्या नव्या पिढीतील याच क्षमतेचा विकास हेच पालक व शिक्षकाचे कार्य.
यशाचे साचे आणि टक्क्यांचे मुकुट मिरवणाऱ्या मार्केटिंग युगातील फिरता विक्रेता म्हणजे आपला विद्यार्थी न होता त्याला संपूर्ण माणूसपणाचा निर्मळ आनंदयात्री करावयाचे आहे. त्यासाठीच मैत्रीच्या विश्वासाची ऊब देणारा हा परिसस्पर्श....
पालक पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी
मार्गदर्शन करणारी खूप सुंदर अशी ही साहित्यकृती
आहे
🙏🙏🙏💐
सेवालाल यांच्या समाजोद्धाराच्या क्रांतीचा संघर्षमय सत्य सांगणारी साहित्यकृती
क्रांतिसिंह सेवादासतोडावाळो .. ( लवकरच आपल्या भेटीला )
.

✍एकनाथ लक्ष्मण गोफणे ...
---------------------------------------------------------------------------------------------------------------पुुुस्तक परिचय--------------------
परिवर्तनाची नांदी ठरलेली तेजस्वी कहाणी-लेखक पंजाब चव्हाण यांची साहित्यकृती 'याडी'
लेखक पंजाब चव्हाण यांनी निलंबनाच्या
संकट काळात लिहीलेली गरीबीच्या झळांमधून तावून सुलाखून निघालेली परिवर्तनाची नांदी ठरलेली ही तेजस्वी कहाणी याडी आहे.
गोरबंजारा प्रकाशनने याची द्वितीय आवृत्ती प्रकाशित केली हेच या साहित्यकृतीचे यश म्हणावे लागेल.
याडी आत्मकथनाच्या एकूण 19 भागांमधून
लेखकाचा संघर्ष, जडणघडण, वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणा-या स्वकथनातून पोहोचतो.
सुंदलयाडीची
परिश्रमावरची निष्ठा, प्रामाणिकपणाची जोड, संघर्ष, कुटुंबाची काळजी, स्वतः उपाशी राहून लेकरांचे पोट भरले जावे यासाठीची तळमळ ,संयम व निर्भयता त्याचसोबत बाप लालसिंग यांचं स्वाभिमानी व्यक्तीमत्व,लेखकाच्या सामाजिक व वैचारिक सामर्थ्याची ओळख दर्शवितो .काका भिका जेव्हा कुटुंबांपासून वेगळा होण्याची भाषा करतो तेव्हा ,सर्व वस्तू भिकाला द्या व माझे आईवडील मला द्या हे म्हणणारा बाप. एका घराच्या दोन चुली झाल्यावर आलेला करुण प्रसंग,व एकच चुल बरोबर पेटत नसताना दुसरी चुल कशी पेटेल हा लेखकाच्या मनात निर्माण झालेला प्रश्न तत्कालीन आर्थिक परिस्थितीची जाणीव करुन देतो.
याडी साहित्यकृतीतून लेखक पंजाब चव्हाण यांनी काकांची वेगळी चुल सह तांड्यातील प्रतिबिंब, पुष्पावंती नगरीत प्रवेश,योगायोग ,तांडा चालला शेतकी शाळा- एक आठवण, जीवघेणी रात्र, लग्नात मस्त, टटेल कंपनी, टाऊन हॉल , मुलाखत , भंडारा जिल्ह्यातील जीवन व वास्तव्य, झिपरी बाई सह,बाबासाहेब नाईक यांच्या धर्मपत्नी,नाननी नायकण,मनोहर नाईक, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पत्नी सीता आदींच्या आठवणी सह सामाजिक उत्तरदायित्व या भावनेतून बंजारा कर्मचारी संघटनेने कार्य बाबा आमटेंच्या भेटीचा प्रसंग आदी बाबी दिलखुलासपणे मांडलेल्या आहेत. आर्थिक परिस्थिती मुळे उभे राहणारे अनेक कठीण प्रसंग,त्यातून शिक्षण घेण्यासाठीची लेखकाची जिद्द.
आजोबांनी लेखकाचं शाळेतील भाषण ऐकून याडीला सांगितलेले,सुंदल तुझा पोरगा फार हुशार आहे, एक दिवस तुझ्या पोराच्या मागेपुढे चपराशी राहतील ,मोठा साहेब होईल. हा आशावाद निर्माण करणारा आशिर्वाद आईला आशेचा किरण दाखवणारा ठरला.त्याच प्रेरणेतुन संसाराचा गाडा संघर्षमय रस्त्यावरुन ओढताना याडीची होणारी दमछाक व शिक्षणाने सुसंस्कृत होणारा लेखक
पंजाब चव्हाण सक्षमपणे उभा राहतांना दिसतो.
तांड्याच्या संस्कृतीची ,नसाबनितीची जपणूक करण्यासोबत तांड्याच्या परिवर्तनाची गरज देखिल
लेखक सहजेने नमुद करतो.जीवघेणी रात्र मधला प्रसंग अंगावर शहारे आणणारा आहे तर लग्नात मस्त या भागात लेखक कधी हळवा होतो तर कधी कठोर भुमिका घेतांना दिसतो.आंध्रप्रदेश मध्ये कापूस विकायला जाणा-या शेतकरी बांधवांच्या समस्येच्या मांडणीतून याडी ही साहित्यकृती शेती माती नाती गोती यांची घट्ट नाळ जोडण्याचा प्रयत्न करते.
लेखकाने स्वतःची वेदना व्यथा मांडलेली आहे. शिकत असताना तो नोकरी करत असताना त्याला मंडळी आणि त्याचं जगणं वागणं गोष्ट त्यांनी मांडलेली आहे .रात्रभर जागायचं बंजारा भजन करायचा वेगवेगळ्या ठिकाणचे बंजारा भजनी मंडळ त्यावेळेस होते ते आजही आहेत आणि या माध्यमातून तांड्याला कोणत्या प्रबोधनाची गरज आहे हेसुद्धा या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे. त्यावेळी पुसद मध्ये एकमेव फुलसिंग नाईक विद्यालय होते आणि फुलसिंग नाईक आणि जिवंतपणी वसंतराव नाईकांना महाविद्यालय सुरू करण्यास भाग पाडले होते ही वसंतराव नाईक यांच्या वडिलांचे दूरदृष्टी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे
व्यक्तीला समृद्ध करणे यावर ठाम विश्वासाने बदलायचं कसं तर परिवर्तनासाठी तांड्यात महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, वसंतराव नाईकांचा अभ्यास करणं जरुरीचं वाटतं अशी ही गोष्ट या माध्यमातून लेखक अधोरेखित करतात तांड्याला परिवर्तनाकडे घेऊन जातात. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आठवणींचा पट मांडलेला आहे. मामाच्या मुलीला जी भविष्यात त्याची बायको असावी तर अशी कशी त्याच्या संदर्भात फार रंजक पद्धतीने त्यांनी मांडलेल्या आहे. तीच्या सोबतचा प्रवास त्या रस्त्याकडे आलुबोंडा खाऊन बसने केल्याने शेलू तुं उतरून पांदण निघाले आणि तिथून सीताचा आणि त्यांचा प्रवास सुरू झाला व भविष्यात किती चांगला होता हे त्यांनी मांडलेला आहे सीता ची सात आणि त्यासाठी ते कधीतरी लपून दोन शब्द बोलायचे ते मान हलवायची तिच्यासाठी मी तसेच तिला चोरून दे तसेच होस्टेलवर असताना आलेली आठवण लेखकाच्या मनाची तगमग व प्रेमभावाचं दर्शन घडविते.लेखकाचा हळवेपणा यातून दिसतो.याडी मध्ये येणारी झिपरीबाई ही व्यक्तीरेखा मनाची श्रीमंती दर्शविते. जिव्हाळा जोपासले. संघर्ष करत ,लढत, झगडत, परिवर्तनाच्या दिशेने ,जाणारा, भटक्यांचं दु:ख अनुभवणारा व त्यातून घडणारा लेखक ,सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सामाजिक सुधारणा विषयावर कार्य व संघटन करताना दिसतो.
याडीच्या प्रथम आवृतीचं मुखपृष्ठ प्रा.रवि चापके यांनी तर द्वितीय आवृतीचं मुखपृष्ठ जयंती आष्टनकर यांनी साकारले असुन संस्कृतीरक्षण, संघर्ष व शिक्षणाने परिवर्तन होईल व यशाची शिखरे गाठता येतील यासाठी धडपणारी याडी यात दिसते. भीमणीपुत्र मोहन नायक यांच्या प्रस्तावेमुळे याडी चा साहित्यक्षेत्रातील प्रवेश सुकर झाल्याचे दिसून येते .
भविष्यात पंजाब चव्हाण यांनी गोरबोलीत काव्यसंग्रह प्रकाशित करावा. त्यात स्वावलंबनाची व स्वाभिमानाचा संस्कार करणा-या बापावर, लालसिंग चव्हाण यांच्यावर एक कविता असावी.
याडी, शिकारी राजा, बंजारा हस्तकलेची शोकांतिका आदी साहित्यकृतीस सोबतच साहित्यिक पंजाब चव्हाण यांच्या समाजपरिवर्तन व वाचन चळवळीला गती देणा-या आगामी साहित्यसेवेस हार्दिक शुभेच्छा.....
-----------------------------------
'हसत-खेळत शिकूया'
प्राथमिक शिक्षक म्हणुन स्थानिक स्वराज्य संस्था,जि.प.जळगाव अंतर्गत ग्रामिण भागातील प्राथमिक शाळेत कार्यरत राहून
विविधांगी उपक्रम राबवून , शिकणं व शिकवण्याची सुयोग्य गुंफण करुन ,उपक्रमशील आणि प्रयोगशिल शिक्षक म्हणून राज्यभरातील शैक्षणिक क्षेत्रात नवी ओळख निर्माण करणारे,विद्यार्थीप्रेमी शिक्षक अरुण पाटील यांनी खास विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त, गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र
'हसत-खेळत शिकूया'
या पुस्तकाची निर्मिती केली आहे.हे पुस्तक नावाप्रमाणे खूप सुंदर आहे.एटीएम प्रकाशन यांनी 2019 मध्ये प्रकाशित केलेली ही प्रथमावृत्ती का.स.वाणी संस्था धुळे यांनी मुद्रीत केली आहे .
या पुस्तकाची प्रस्तावना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि ए.टी.एम.चे राज्य संयोजक यांनी दिलेली आहे
विक्रम अडसूळ यांनी लिहीली ही जमेची बाजू आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाचन-लेखन निर्णय अपेक्षित आहे आणि ते ज्ञान अवगत करण्यासाठी अरुण पाटील यांनी तयार केलेला आहे एकूण 58 पानांचे हे पुस्तक तयार केले आहे .
त्याच्यामध्ये खूप मजेशीर संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत.
चित्रातून शब्द वाचण्याची सोय आहे, वाचा व लिहा, शब्दांची बाग त्यासोबत अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी छोट्या-छोट्या शब्दांमधून शब्द कृती तयार करण्यासाठी हे पुस्तक खूपच उपयुक्त आहे.
मुळाक्षरां पासून तयार होणारे शब्द.
बाराखडीची ,चौदाखडी झाली .
ती चौदाखडी सुद्धा स्वतंत्रपणे त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे. शब्द दिलेले आहेत जोडाक्षरी शब्द एकूण सहा पेजवर त्यांनी दिलेले भरपूर पद्धतीचे जोड शब्द कृतीयुक्त सरावासाठी दिलेले आहेत.
समानार्थी शब्दांचा ही एक समूह आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, घर दर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द ,शब्द समूहाबद्दल शब्द, त्यासोबत पिल्लू दर्शक शब्द, म्हणी आणि त्यांचे अर्थ त्यासोबत अंकांची ओळख 1 ते 9 या अंकांची ओळख चित्रातून आणि संख्या नामातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
1 ते 100 पर्यंतचे अंक स्वतंत्र रकान्यात आणि ठळकपणे याठिकाणी त्यांनी दिलेले आहेत.
2 ते 10 पर्यंत चे पाढे, अकरा ते विस पर्यंत चे पाढे, 21 ते 30 पर्यंतचे पाढे दिलेले आहेत .
त्याच सोबत या पुस्तकामध्ये पान नंबर 56 वर अक्षर शब्द लेखनाचा , वाक्य लेखनाचा सराव विद्यार्थ्यांना नियमित फळे करता यावा यासाठी ओळीसाठी एक स्वतंत्र कोरे पेज दिलेला आहे.
उजळणी पाढे लेखनाचाही
पुस्तकातून सराव व्हावा म्हणूनही हे एक स्वतंत्र चौकट असलेला रकाना एका पेजवर दिलेला आहे आणि प्रजासत्ताक दिनाची माहिती सुद्धा त्यांनी दिलेले आहे हे पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याने त्यांच्या कल्पनेला वाव देण्याचे काम करणार आहे.स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त, गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र म्हणजे 'हसत-खेळत शिकूया' होय.
भविष्यात अरुण पाटलांनी आपल्या बालकवितांचा व बोधकथांचा संग्रह तयार करावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य संदर्भात आलेले अनुभव याच्या संदर्भात सुद्धा स्वतःचा अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कृतीं या अनुभवाची सुद्धा एक पुस्तिका काढावी.
त्यांनी इंटरनेटवर लिहिलेली मराठी भाषेतील अनुदिनी म्हणजे, त्यांचा 'तंत्रगुरु' हा ब्लॉग सुद्धा, त्यांच्या कौशल्यात्मक कार्याला समाजासमोर आणतो ..
सध्या पिंपळगाव बु ता.भडगाव येथिल जि.प.शाळेत कार्यरत असलेले ,अरुण शिवाजी पाटील यांच्या लेखनासह ते शिक्षक म्हणुन करीत असलेल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
------------------------
लेखन:-एकनाथ गोफणे
======================================
परिवर्तनाची हाक देत आठवणी जागृत करणारा श्रीकांत पवार यांचा काव्यसंग्रह
कांयी कू गोरुर साकी
डोंबिवली येथे मार्च 2018 मध्ये संपन्न झालेल्या पाचव्या अखिल भारतीय बंजारा संमेलनात कवी श्रीकांत पवार यांच्या
कांयी कू गोरुर साकी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.परिवर्तनाची हाक देत आठवणी जागृत करणारा हा काव्यसंग्रह आहे.
कवी श्रीकांत पवार हे यवतमाळ जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सामान्य प्रशासन विभागात त्यांनी सेवा केली आणि 2009 मध्ये ते सेवानिवृत्त झाले आहेत. ध्यास कवितेचा मंच बोरिवली याचे ते सदस्य आहेत.
त्यांचे अनेक लेख कविता गझल हे प्रकाशित झालेले आहेत. 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तसेच 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सह 15वे आगरी सांस्कृतिक साहित्य संमेलन डोंबिवली येथे सुद्धा त्यांनी
त्यांनी आपल्या कवितांचं सादरीकरण केलं आहे .
कवी श्रीकांत पवार यांच्या कवितेचा काळ हा 60 च्या दशकातला त्या काळातला बंजारा समाज त्यांची बोली भाषा संस्कृती चालीरीती आणि आजचं वास्तव जीवन , तांड्याचं दुःख त्यांनी या काव्यसंग्रहात मांडलेलं आहे .
एकूण ५३ वेगळ्या प्रकारातील गोरबोलीभाषेतील कवितांचा हा काव्यसंग्रह आहे.
यामध्ये निसर्ग व माणुसकी आहे .संस्कृती व परिवर्तन आहे.आठवण आहे बंजारा गोर बोलीभाषेत हायकू या प्रकारात सुद्धा श्रीकांत पवार यांनी लेखन केलेलं आहे. गोरबोली भाषेतील विविध शब्दांचे ज्ञान करुन देत, मानवी जीवन परिवर्तन कवितेतून मांडण्याचा प्रयत्न काव्यसंग्रहात केलेला आहे.
आधुनिक काळात वेगवेगळ्या भूलथापांना मध्ये आम्ही जीवनाचा आनंद कसा विसरलोय, माणसाची एवढी गर्दी आहे तरीसुद्धा माणूस एकटाच आहे हे सांगणारी त्यांची जगेर हवा ही रचना खूप काही सांगून जाते.
गोरबोलीभाषेत दुःख सांगणारी 'काल म देको' ही रचना आहे.
आशावाद जागृत करणारी उंच भरारी घ्यायला लावणारी 'मनक्या'
ही कविता निसर्ग प्राणिमात्रांची उदाहरण देत स्वतःला सुद्धा समृद्ध करण्याचा ध्यास प्रत्येकाने घ्यावा असं सांगते.
मार लिदे भरारी
भरोसो पकोडाप
लिदे जिम्मेदारी तो
वाट मळ आपोआप
या शब्दातून उंच भरारीचा आशावाद त्यांनी मांडलेला आहे .
'वो दन' या कवितेतून त साठच्या दशकातली त्यांचं जीवन , तांड्याची स्थिती आणि वृक्षाची आठवण देखील मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर सोबतच वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अधोरेखित करणारी रचना सुद्धा ह्या काव्यसंग्रह मध्ये आहे
परिवर्तनाची हाक देणारी आणि अनेकांच्या मनामध्ये घर करून राहिलेली त्यांची 'दुनिया बदलगी' ही कविता आज परिवर्तनाचं गाणं म्हणून बंजारा समाजात आनंदाने गायीली जाते व ऐकली जातेय.
तांड्याचा संदर्भ बंजारा एकदा निसर्ग मारोळी नावाची कविता शब्द सौंदर्याने सजलेली आहे
परिवर्तनाची हाक देणार आहे एकत्र आणणारा जागृतीचा संदेश 'नंगारा' या कवितेतून दिसून येतो. शेतकऱ्यांचं दुःख मांडून त्यांना आधार देणारी 'मत व जीवेपं उदार' नावाची कविता शेतकऱ्यांना एक आधार देणारी आहे ,'कर्ज फिट जायेरे,आज ना सवार 'असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात जागृत करणारी ही रचना आहे
त्यांनी 'हायकू' प्रकारात सुद्धा या काव्यसंग्रहात काव्यलेखन केलेलं आहे.त्यासोबत बंजारा लेंगी गीतातून केसुला चे उपयोग, आणि होळी लेंगी प्रेमगीत काव्यसंग्रहात आहे.
परिवर्तनाची हाक देणारा आणि आठवणी जागृत करणारा त्यासोबतच बंजारांच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गोरबोली भाषा समृद्ध करणारा 'कांयी कू गोरुर साकी' हा काव्यसंग्रहआहे. श्रीकांत पवार यांच्या लेखन कार्यास एकनाथ गोफणे तर्फे हार्दिक शुभेच्छा .
******************************************
तांड्याचं संघर्षमय जगणं गोरबोलीत प्रभावीपणे मांडणारी
भरकाडी.
![]() |
भरकाडी डॅा.गणेश चव्हाण |
मराठी साहित्यामध्ये भरकाडी नावाचा कथासंग्रह डॉक्टर गणेश चव्हाण यांनी प्रकाशित केलेला आहे डॉक्टर गणेश चव्हाण हे संत गाडगे महाराज महाविद्यालय हिंगणा नागपूर या ठिकाणी मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा भरकाडी हा कथासंग्रह यामध्ये एकूण नऊ कथा आहेत आणि दहावी कथा आहे ती गोरबोली भाषेत त्यांनी लिहिलेली आहे भरकाडी नावाची कथा आहे ती बोली भाषेत त्यांनी लिहिलेले आहे या कथासंग्रहातील संपूर्णतः व्यक्तिरेखा आहेत या बंजारा तांड्याचं चित्रण दर्शवितात. बंजारा तांडा या कथासंग्रहाचे निमित्ताने मराठी
साहित्यात आला. तांड्यातला येडा आणि ती ,एक कळी कुस्करलेली,
ढोंगी देम्या,खेळ भातुकलीचा, लग्न एक जुगार, वनाई, उलंगलेली जीवनवाडी,जगण्याने छळले होते.या मराठी कथा आणि त्यासोबत भरकाडी या कथेचं गोरबोली भाषेत लेखन केले आहे.या कथासंग्रहात मराठी , व-हाडी बोली गोरबोली आणि हिंदीतले संवाद हे कथेत रस वाढवतात वाचकांना खिळवून ठेवण्याची क्षमता या कथांमध्ये आहे .या कथासंग्रह मध्ये वेदना आहे,कारुण्य आहे, विरह आहे, प्रेम आहे मैत्री आहे , नाट्य आहे त्याच सोबत वाद आहेत यश आहे न्याय-निवाडा संघर्ष रोजगारासाठी भटकंती त्याच्यासोबत सरकारचे धोरण, पुतळे उभारण्यासाठी सरकार तर्फे हेणारा खर्च आणि शेतकऱ्यांच्या व्यथा.शेतकऱ्यांच्या मालाला भाव आला की लगेच महागाई वाढते , वृत्तपत्रांमध्ये त्याची दखल घेतली जाते, कृषी मंत्रालय शेतकऱ्याची व्यथा समजून घेऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांचा विषयावर कसे राजकारण चालू आहे हे स्पष्टपणे मांडण्याचा,'तळागाळाचा,या मातीचा' विचार करण्याचे सामर्थ्य या कथासंग्रहात आहे.
लेखक प्रा.डॉक्टर गणेश चव्हाण यांनी कथासंग्रहाच्या माध्यमातून विविध बंजारा तांडे आणि त्यात जगणारे लोकं, कथानायक म्हणून आलेला बंजारा माणूस याठिकाणी उभा केलेला आहे .व्यंकटेश , संयोगिता आणि नरेश हे पात्र असतील त्यासोबत तोळा नावाच्या माणसाची होणारी परवड ,सासर आणि माहेर दोन्ही बाजू सांभाळत होणारा आघात मन सुन्न करुन जातो.चिटुरवाला त्याचं परीवरचं प्रेम, शिक्षण संस्था चालकाने गळ घातलेली पोरगी, नोकरीसाठी होणारी तडजोड व त्यातून जीवन भरकाडी जमिनी सारखे कसे असते हा संघर्ष मनाला चटका लावून जातो.
वडांगळी व पोहरादेवी हे दोन्ही बंजारा समाजाची धार्मिक स्थळे या निमित्ताने या कथेचे आलीत.या कथासंग्रहात मांडवा तांडा,गोविंदपूर तांडा,आणि जुनपाणी तांडा हे बंजारा तांडे प्रामुख्याने दिसून येतात.मामा आणि बंडू यांची जोडी आणि तर्री खायची रस्सा खायची ही गोष्ट या कथासंग्रहातून वाचतांना वास्तवतेकडे नेते.त्यासोबत बंजारा समाजातील अनिष्ट हुंडा पद्धत आणि बापाचं कर्जबाजारीपणा या विषयावर भाष्य करते ,नक्षलवादी भागात होणारी मुलाची पोस्टींग व त्या भीतीपोटी रात्रभर चिंतेत राहणारे त्याचे आई वडील,आदिवासी शिक्षणाची व्यथा व ती सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्याचे हाल व यातून त्याची आपल्या तांड्याकडे परतण्याची तयारी, तसेच उच्चशिक्षित माणसाची सुद्धा कशी परवड होते, हे 'तोळा' च्या व्यक्ती रेखेतून दिसते.तांड्याचं दु:ख मांडताना येथिल आरोग्य सेवा कशी आहे हे सांगताना लेखकाचे कौशल्य दिसते. विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा, तांड्यात शिरकाव करणारी सावकारी पद्धत, देम्याचा आळशी स्वभाव व त्यातून निर्माण होणाऱ्या घटना सोबत सरोजचं स्त्री सौंदर्य वर्णन लेखकाने अप्रतिम रेखाटले त्याचसोबत व्यंकटेश च्या चिठ्ठी ची गंमत,मनाची घालमेल अचुक टिपलेली दिसते.बदनामी च्या भितीने त्रस्त झालेली आई सामाजिक व्यवस्थेची स्थिती दाखविते. अवैध होणाऱ्या जंगलतोडीमुळे होणाऱ्या घोटाळ्यावर कथासंग्रह प्रकाश टाकतो.सदर कथासंग्रहास बंजारा साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नाईक यांची प्रस्तावना लाभली आहे. नागपूर च्या 'राघव'प्रकाशन मार्फत अप्रतिमपणे कथासंग्रहाची मांडणी करण्यात आली आहे. उज्वल क्रिएशनने मुखपृष्ठ सुंदर केले आहे.भरकाडी अनेकविध पुरस्काराने सन्मानित होवो. गोरबोलीत त्यांनी अजून स्वतंत्र साहित्य निर्माण करुन गोरबोलीस नवा आयाम देण्याचा प्रयत्न करावा.
डॉ. गणेश चव्हाण यांनी यांच्या आगामी साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
लेखक
एकनाथ गोफणे
----------------------
२
पुस्तक परिचय
कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ असलेला काव्यसंग्रह 'नात्यांच्या पलीकडले '
शब्द, शब्द आणिक
शब्दांची गुंफूनिया माळ
होते जरी कविता ....
आयुष्याच्या चढ _ उतरणीत
जीवन हे काव्य होऊनी जगावे.
असा सुंदर संदेश देत जगण्याची प्रेरणा देणारा 'नात्यांच्या पलीकडले '
हा कवयित्री रिता जाधव यांचा ६७ कवितांचा काव्य संग्रह म्हणजे मानवी मन , नातं, आयुष्य या सोबत कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ आहे. माणूस व माणुसकीतला प्रेमभाव हा कवितेचा स्थायीभाव आहे.
मुक्तछंदातल्या वाचक मनावर अधिराज्य करणाऱ्या कविता अनुभव सिद्ध आहेत.या काव्यसंग्रहाची व्यापकता फार मोठी आहे.निसर्ग , प्रेम , कर्तव्य , जीवनातील गंमत,कृतज्ञता , जगण्याची उमेद, पोलिस व लाठी , आई, आजी , मुलगी , बाप , कन्या , शेतकरी , पाऊस, भिकारी , व्यसनमुक्ती या सारखे अनेकविध विषयांनी या काव्यसंग्रहाला वेगळपण आलयं.जगण्याचं भाव व्यक्त करणाऱ्या,भावविश्वाशी नातं जोडणाऱ्या या कविता संग्रहातील कविता ,स्त्रीने जरी लिहिलेल्या आहेत तरी वाचतांना त्या एका व्यक्तीच्या आहेत म्हणजे स्त्री -किंवा पुरुष हा लिंगभेद नष्ट करुन एका व्यक्तीमत्वाची अभिव्यक्ती या काव्यसंग्रहातून दिसते. हे वाचतांना जाणवते.नाते संबंध व नात्यांच्या पलिकडचा जिव्हाळा यांचा सुंदर संयोग वाचकांना दाखविण्याचं कौशल्य या काव्यसंग्रहात आहे. प्रतिमा व प्रतिकांची सुयोग्य मांडणी काव्यसंग्रहाची ऊंची सांगते.
हा काव्यसंग्रह जगण्याचं गुपित सांगतो, संवेदनशिल बनवितो, कर्तव्यावर प्रेम करायला शिकवितो, मनात जाणिव व सहानुभूती निर्माण करतो.कवयित्रीने पोलिस सेवेतील प्रसंग, कर्तव्याची जाण व त्या अनुषंगाने आलेले बरेच अनुभव काव्यात्मक शैलीत मांडले आहे.
अनेक वेळा विविध आपत्ती व विकासाच्या नावाखाली मानवी जीवनाचं विस्थापन होतं. शासन यंत्रणा त्याचं पुनर्वसन करीत असतं पण त्या अवस्थेतील मानवी मनाची होणारी घालमेल आपल्या शब्दातून मांडतांना व्यवस्थेला पण जाब विचारण्याचं धाडस करणारी कविता वाचतांना पुनर्वासितांच्या मनाचे आंदोलन जाणवते.
'पूनर्वसन करतांना करता येईल का
आमच्या महत्त्वाच्या
बळी पडलेल्या क्षणाचं
की ह्या भेदरलेल्या मनाचं
पहा जमतय का
नाहीतर ,
आहे हेच जगणं '.....
ही जगण्याची व्यथा मांडून मानवी जीवनाची वास्तव स्थिती या
कर्तव्यपूर्तीचा आनंद हा प्रेरणादायी असतो. हे स्वत : पोलिस सेवेत कार्यरत राहून , अत्यंत चिकित्सक पणे व समाजाभिमुख साहित्य निर्मिती हे मुख्य अंग या संग्रहातून दिसतं.
शब्दगंध प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहाचे
मुखपृष्ठ छान आहे.ज्यातून धरती व आभाळाचं नातं व त्या नात्यांच्या पलिकडच्या जाणीवांचा शोध घेण्यासाठी पुढे पुढे जाणारं स्त्री मन प्रतित होतं.
सहज गंमत म्हणून कवितेतून ' दारु ' चे दुष्परीणाम सांगणाऱ्या
'पोलादालाही वाकविण्याचं
सामर्थ्य असणाऱ्या माणसाला
हिनं पुरतं बधिर केला
खरं हाय मित्रा
दारु इकणाऱ्याने
बांधले असतील इमले,
पिणाऱ्यांन न्हाई
ह्याचा प्रत्यय
मलाबी आला '
या ओळीतून मार्मिक पणे व्यसनावर प्रहार करुन सामाजिक भान देण्याचं शब्दांचं सामर्थ्य समजतं.
'सेल्फी ' ही कविता स्वतःची चमकोगिरी करणाऱ्या
राजकीय क्षेत्राला समाजाचं व देशाचं वास्तव चित्रण दिसत नाहीहे सत्य सांगण्याचं कार्य करते.
'घरात लग्नाची लेक आहे
शेतावर कर्जाचा भार आहे
सीमेवरील जवानांचा श्वास
हरघडीला उधार आहे.
ह्या सेल्फीला
दिसत नाही वास्तव जीवन '.......
हा काव्यसंग्रह , सिग्नलची गोष्ट , खाकीची व्यथा , शेतातल्या रामकाठची कथा पण सांगतो. दादा कोंडकेंच्या कलेला पण आठवणीच्या रुपाने जपून ठेवतो, मुंबईच्या धकाधकीत आधार वाटणारी लोकल अन शेतकऱ्याच्या कार्याप्रती कृतज्ञ पण होतो.कर्तव्य, संवेदना, जाणिव व जगणं यांचा सुंदर मिलाफ म्हणजे नात्यांच्या पलीकडले हा काव्यसंग्रह आहे.
भविष्यात रिता जाधव यांनी , असाच एक समृद्ध काव्यसंग्रह गोरबोलीभाषेत प्रकाशित करावा ही वाचकांची अपेक्षा आहे. रिता जाधव -राठोड यांच्या लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा !
....................
लेखक - एकनाथ गोफणे
-------------------
३
पुस्तक परिचय
परिस स्पर्श .......
पालक पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी
मार्गदर्शन करणारी साहित्यकृती असून या पुस्तकाचा आज आपण परिचय करुन घेणार आहोत..
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. प्रविण दवणे यांनी परिसस्पर्श या साहित्यकृतीला वाचकांसाठी आणलय.
प्रकाशन ... हे पुस्तक नवचैतन्य या प्रकाशनाने सन डिसेंबर २०१५ मध्ये प्रकाशित केले आहे.
मुखपृष्ठ.. पुस्तकाचं मुखपृष्ठ फार आकर्षक आहे..
सूर्यासारखी झेप घेण्याचा आत्मविश्वास आपल्या मुलाच्या मनात निर्माण व्हावा, यासाठी त्याला स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणारा बाप ...
असं हे उद्बोधक चित्र पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट मांडतं...
सदर चित्र पुंडलिक वझे यांनी रेखाटलं आहे..
लेखक परियय- ठाणे येथे 3५ वर्ष मराठीचे अध्यापन करणारे
सुप्रसिद्ध साहित्यिक
श्री. प्रविण दवणे हे वास्तवता मांडणारे , लेखक आहेत. संवेदनशिलता व मार्गदर्शकाची भूमिका हा त्यांचा लेखनाचा गुण आहे.
त्यांनी आत्ता पर्यंत _ कविता , गीतरचना , ललित गद्य , कथा , कादंबरी , नाटक अशा विविध वाड़्मय प्रकारात लेखन केले आहे. त्यांनी आतापर्यंत ८ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भुषविलं आहे.
अंतरंग. परिस स्पर्श या पुस्तकात प्रविण दवणे यांनी एकूण १ ते ३२ वेगवेगळे विषय घेऊन लिहीलेल लेख संवेदनशील पालक - शिक्षकांसाठी पुस्तक रुपात मांडलेत.
आपल्या अध्यापनाचा विषय कुठलाही असो विद्यार्थांशी मैत्री करा. त्यांना बालपण अनुभवू दया असा सल्ला ते देतात.
एका प्रकरणात लेखक म्हणतात,
शाळांबद्दल अनास्था आणि घराबद्दल वाटणारं भय ही उद्ध्वस्त भविष्याची नांदी ठरु नये.
.. गैरहजर मुलांची ब्लॅक लिस्ट
भिंतीवर लिहील्या बद्दल रस्टिकेट नाही,
गृहपाठ नाही _ वर्गाबाहेर
मोबाईल वाजला - झडजप्ती हे उपाय नाहीत . या अशा चुका मार्गदर्शनाअभावी भरकटलेल्या मनांकडून अजाणात होतात.
अशा असंख्य गोष्टी सुसंवादाने सुखान्त होतात.
आक्रमक वाटणारीच खुप मुलं पुढं आपले जिव्हाळ्याचे दोस्त होतात.
कारण ऊर्जेचं दिशा शून्य गाठोडं आता योग्य दिशेनं वाहू लागलेलं असतं '
पालक व शिक्षकांसाठी आवश्यक हे पुस्तक सर्वांनी जरुर वाचावे व आपल्या गृह ग्रंथालयात आवर्जून संग्रही ठेवावे..
मलपृष्ठ.. परिस स्पर्श या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक प्रविण दवणे यांनी म्हटलयं ,
सकारात्मक उपक्रमशिलता हाच विद्यार्थी , शिक्षक आणि पालक या नात्याचा प्राणवायू आहे. जगावेगळी अपूर्व क्षमता अंगी असलेल्या नव्या पिढीतील याच क्षमतेचा विकास हेच पालक व शिक्षकाचे कार्य.
यशाचे साचे आणि टक्क्यांचे मुकुट मिरवणाऱ्या मार्केटिंग युगातील फिरता विक्रेता म्हणजे आपला विद्यार्थी न होता त्याला संपूर्ण माणूसपणाचा निर्मळ आनंदयात्री करावयाचे आहे. त्यासाठीच मैत्रीच्या विश्वासाची ऊब देणारा हा परिसस्पर्श....
पालक पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी
मार्गदर्शन करणारी खूप सुंदर अशी ही साहित्यकृती
आहे
🙏🙏🙏💐
सेवालाल यांच्या समाजोद्धाराच्या क्रांतीचा संघर्षमय सत्य सांगणारी साहित्यकृती
क्रांतिसिंह सेवादासतोडावाळो .. ( लवकरच आपल्या भेटीला )
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपलं मत