साहित्य संमेलनातून

 सरकारने   बंजारा बटालियनची निर्मिती करावी..
    भरकाडीकार प्रा.डॉ. गणेश चव्हाण ...
कथा आणि व्यथा : तांड्यांच्या आणि पोडांच्या... परिसंवाद संपन्न..

पूर्वीच्या काळी बंजारा समाज हा शूरविर होता, लढवय्या होता पण आज भटकंती मुळे व बेकारीचे प्रमाण वाढले असून अनेक तरुण रोजगाराअभावी बेकारीचं जीवन जगत असून शासनाने भारतीय सैन्यदलात मराठा बटालियन प्रमाणे बंजारा बटालियन तयार करुन  बंजारा समाजातील तरुणांची वाढती बेकारीही समस्या दूर करावी अशी मागणी भरकाडीकार साहित्यिक  प्रा.डॉ. गणेश चव्हाण यांनी केली..
यवतमाळ येथिल बचत भवनात९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथा आणि व्यथा : तांड्यांच्या आणि पोडांच्या... परिसंवादाच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते.
परिसंवादात यावेळी कोलाम समाजाचे अभ्यासक....प्रकाश घोटेकर ,रविंद्र कोकरे,डॉ. वसंत राठोड,भाऊसाहेब राठोड, भाग घेऊनबंजारा , कोलम , पारधी , धनगर यांच्या कथा व व्यथा मांडून भविष्याची उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न केला.मोठया व्यासपिठावर हे मांडलं जातय ही तर मुख्य मंडपात या कथा  व्यथा मांडल्या गेल्या , ऐकल्या गेल्या असत्या तर अधिक लोकांपर्यंत या समाजघटकांचं एकत्रित दुःख इतरांनाही समजलं असतं असा सूर पण परिसंवादात उमटला. भटक्या समाजाच्या व्यथा व कथा सांगण्यासोबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगून भटक्या समाजाच्या यशोगाधा निर्माण करण्यासाठी संमेलन व्हावे असा चांगला सूर या परिसंवादातून आला.
सर्व भटक्यांना एकत्र केलं तर ,मोठी शक्ती निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे व भटक्या समाजाच्या समस्येची दखल संशोधनात्मक स्वरुपातून घेण्याची गरज परीसंवादातून व्यक्त झाली. बंजारां समाजाला मौखिक साहित्याची मोठी परंपरा असून , आगामी काळात मूल्याधिष्ठीत  साहित्य निर्माण करण्याची आवश्यकता असून गोरबोलीभाषा बोलणाऱ्यांची संख्या देशात सर्वाधिक असून या भाषेला घटनात्मक दर्जा मिळावा अशी मागणी संमेलनातून पुढे आली.  बंजारा साहित्यिक भिमणीपुत्र मोहन नाईक यांच्या कार्याचा परिसंवादात झालेला शाब्दीक गौरव साहित्यिकांना नवी ऊर्जा देणारा ठरला. कोलाम समाजाला वर्तमानातील सामाजिक संघर्षाला बळ देण्यासाठी घटनात्मक मार्गाने लढा उभारण्याची क्षमता या परिसंवादाने दिल्याचं जाणवलं. धनगरांसोबत , पारध्यांच्या वस्तीचं वास्तव दर्शन घडवून सामाजिक उत्थानाचा नवा विचार मांडण्याचा प्रयत्न परिसंवादातून दिसून आला. प्रा. विजय राठोड यांच्या बहारदार आवाजाने , उत्तम मांडणीने परिसंवादाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. साहित्याने हा संघर्ष कथा -व्यथेच्या स्वरुपात मांडून यशोगाथा लिहिण्यासाठीचा सकारात्मक विचार या परिसंवारातून पुढे आला.
कथा आणि व्यथा : तांड्यांच्या आणि पोडांच्या... परिसंवाद संपन्न..
अध्यक्षिय संवाद साधतांना प्रा.डॉ. चव्हाण पुढे म्हणाले की, तांड्यात माझा जन्म मी तेथे लहान व मोठा झालो.तांडा आपण जवळून पाहिला,अनुभवाला आहे.वेगवेगळे कुळ व गोत्र यांचे सह नावात सुद्धा भौगोलिक स्थाननिहाय वेगळपण बंजारा समाजाचं आहे.विदेशात सुद्धा वास्तव्यात असलेल्या बंजाराचं चित्रपटांमधून  चित्रण होतं,
गीतातून तो दिसतो . हे सत्य असलं, तरी आज बंजारा समाज आजही हालाकी जगणं
जगतोय आपण  तांड्याचा सेवक म्हणून आज बोलतोय हा कृतज्ञ भाव त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.सिंध संस्कृतीत शेती व दळणवळण व्यवस्था होती. तांडा जातीवादावर नाही तर गोर कोरुन साई वेस हा वैश्विक
विचार मांडतो.ही प्रार्थना बंजारा समाजालं ब्रिद ठरावं असं त्यांनी सांगितलं.उकीरडा पुजा, जीवजंतू चं रक्षण भूकेल्याला भाकर,तहानलेल्याला पाणी,देणारी ,उदार मतवादी,बंजारा संस्कृती साहिष्णू आहे. 'पसिना गाळन,  मेहनतेर बाटी खाणु' म्हणजे घाम गाळून , कष्टाची भाकर खाण्याचा विचार ,असा श्रमप्रतिष्ठेला जीवनमूल्य समजणारा मेहनती समाज आहे
बुद्ध व बंजारा संबंधांवर विस्तृत मांडणी करीत असतांना, वसंतराव नाईकांचा शेतकरी हा कारखानदार व्हावा हे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी प्रयत्नांची गरज त्यांनी मांडली.राजकारणी या समाजाच्या मतांवर डोळा ठेवतात यासाठी सावध रहाण्याचा सल्ला परिसंवादातून मिळाला.
वसंतराव नाईक शेती स्वावलंबी योजनेचा बंजारा समाजातील माणूस अध्यक्ष व्हावा अशी मागणी त्यांनी केली.मानवी मूल्य जोपासणारा समाज
वैशिष्ठ पूर्ण कार्य करतो, या समाजाला लोकसाहित्याची मोठी परंपरा आहे.
बंजारांचं साहित्याचा 'तांडा साहित्य ' म्हणून आगामी काळात
उल्लेख व्हावा.तांडा लोक साहित्याने समृद्ध २३ अलंकार असलेली
सुंदर भाषा , चिंतनातून स्वयंभू असलेली गोरबोली३ गुणांनी समृद्ध आहे.राजा भोज, कालिदास, बुद्ध यांचा तांडयांशी संबंध आला असून , सरकार वाघा साठी संरक्षण करतं ही  चांगलं गोष्ट आहे.लोक साहित्य संस्कृती रक्षण संस्था निर्माण होणे गरजेचे,लोकसाहित्याचं जतन झालं पाहिजे, या सोबत सरकारने आश्रमशाळांचा दर्जा वाढवावून  , बंजारा समाजासाठी शिक्षणाच्या  चांगल्या सोई निर्माण करणे,बंजारा समाज विविध राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात असून त्यात एकसुत्री पणा असणं गरजेचं आहे.चंद्रपूर जिल्हयातील जीवती तालुक्यातील १४ गाव तिलंगाणा व महाराष्ट्रात आहे. त्यांची समस्या ,  सोडवून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.
भिमणीपुत्र मोहन नाईक यांच्या 'इथे,साहेबाच्या कुत्र्याला मिळते रोटी '
, या कवितेच्या ओळीतून प्रा.डॉ. गणेश चव्हाण यांनी बंजारा समाजाचं वास्तव चित्रण मांडलं.आंध्र,तेलंगण, कर्नाटक तामीळनाडू सह देश विदेशात सुध्या बंजारा गोरबोलीच बोलली जाते.एक भाषा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने काम करावं असं आपलं अध्यक्षीय संवाद साधतांना प्रा.डॉ.चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं.

परिसंवादात बंजारा , कोलम , पारधी , धनगर यांच्या कथा व व्यथा दिसल्या.
रविंद्र कोकरे यांनी सगळ्यांच जगणं  व वेदना  एक सारख्या आहेत व बोलीभाषेत व्यक्त होणं योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. धनगर समाजाचं चित्रण त्यांनी मांडलं
प्रा. विजय राठोड यांनी सांगितलं की,
व्यथेतून कथा की कथेतून व्यथा ?  हा प्रश्न आहे..मोठया व्यासपिठावर हे मांडलं जातयं, या भागात  समाजाचं बहुलपण आहे. विदर्भाला, यवतमाळला, व सर्वसामान्यांच्या व्यथेला स्थान या संमेलनात मिळालं . ही जमेची बाजू आहे.जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारा बंजारा समाज हा देशासाठी दिशादर्शक आहे .पोडांवरचा कोलाम समाज , 'दंडार ' ही लोकसंस्कृती ही  साहित्यातील आहे ..बंजारा समाजाची साहित्य परंपरा उज्वल आहे, तरी नवं  साहित्यात मूल्य येत नाही..की आणू देत नाही? ही बाब त्यांनी प्रकर्शाने मांडली.समाज प्रगत होतोय.तांड्यातला माणूस शिकला, शहरता गेला तो तांडयात फिरकला नाही, ही भावना व्यथेच्या रुपातत्यांनी व्यक्त केली.पोडा चंदुःख भाऊ मांडवकर कोलाम ग्रंथात मांडल्याच त्यांनी सांगीतलं.भटका समाज स्वतंत्र आहे ,साहित्य मोठं यशोधन आहे,समाजाचं भूत ,भविष्य वर्तमान साहित्य साहित्यकृतीतून यावं.सामाजिक ऐक्य नाही हा साहित्याचा विषय हवा.
समाज प्रगत आहे ,लेखनातून सकारात्मक भाव आला पाहिजे...जगणं साहित्यातून समृद्ध झालं पाहिजे. बंजारा कथा, कविता , कादंबरीतून हे यावं,
समाज व साहित्य ,एका नाण्याच्या बाजू आहे.राजकिय नेतृत्व अभाव ,असल्यामुळे समाज भटकतोय , यासाठी लढणारी माणसं हवी,अन्यायाची पाळंमुळे शोधली पाहिजे,व्यसनाधिनतेची कारणं दिसलं पाहिजे,तांडयाच जीवन मांडलं पाहिजे.समाजाचा वेगळा भाव निर्माण झाला पाहिजे.बंजारा ... जन्मापासून मृत्यूपर्यंत  गाणी म्हणणारा लोकसाहित्याची समृद्ध परंपरा असलेला बंजारा समाज व व कोलाम समाजाची गावबांधणी पद्धत , दंडार संस्कृती  यशोगाथा  निर्माण करण्यासाठी संमेलन व्हावे.
शिक्षणाचं तत्व,शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा. यासाठी छान विषय घेण्यासोबत ,वाचणं, लिहीणे, संदर्भ शोधणे आवश्यक असल्याचं
प्रा. विजय राठोड यांनी सांगितलं.
          वसंत राठोड... यांनी हा परिसंवाद ,दुर्गम भाग व गोंड, आदिवासी व बंजारा बहुल जिल्हा असल्याने यांच्या व्यथेचे कथन मुख्य  व्यासपिठावर असणं गरजेचं होतं. असं म्हणत ,समाजव्यवस्थे बद्दल, खंत व्यक्त केली.
तांडा व समाजाचे २ भाग ... सुधारीत व असुधारीत असं सांगत त्यांनी
तांडा गुडा, वाडी, पाडा, हेटी या नावाने वस्तीस्थानाची माहिती दिली. सर्व आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत.भटकंती करतो म्हणून भटका.....
समाजाची ४०० / ५०० वर्षांपूर्वी दुरावस्था आहे.आस्थिर समाजाला  स्थिर होण्यासाठी , संघर्ष करावा लागतोय. त्यातबंधनाचा फास गळयात घातल्याने हा समाज  अजूनही परिवर्तनाच्या लाटेत आला नाही.जे शिकले त्यांनी आपाल्याकडे पाहिलं नाही हे वास्तव त्यांनी मांडलं.समाजात परिवर्तनाची गती धिमी आहे, त्याला गती देण्यासोबत ,भटक्यांच्या वस्तीतील सुविधांचा अभाव दूर करण्याबरोबर,जनसंप्रेशण साधनाचा उपयोग सकारात्मक पद्धतीने व्हावा,या समस्येची दखल संशोधनात्मकपणे घेण्याचीआवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात अजून शिक्षण पोहचलं नाही
परिवर्तन पोहचलं नाही.भोगरवाडी,राईनपाडा येथील घटना, भटक्या विमुक्तांची व्यथा स्वरुपात मांडली. 'आता ऊठवू सारे रान
वाडी तांडांच्या लोकांसाठी ऊठवू सारे रान ' ही कृती करण्याची गरज  त्यांनी
मांडली.
कोलाम समाजाचे अभ्यासक,प्रकाश घोटेकर यांनी परीसंवादातून ,अती असुरक्षित कोलाम जमातीच्या जगण्याचा संघर्ष सोदाहरण सांगितला. 'कथा व व्यथा ' हा विषय मराठी साहित्य संमेलनात येतो ही आनंदाची गोष्ट असल्याचे सांगत कोलामी ,भाषा यवतमाळ ,नोदेड वर्धा चंद्रपूर , आंध्रमध्ये .. बोलीली जाते. न्याय व्यवस्था .लोकांची व्यवस्था, जात पंचायती, मुळात शांत असलेल्या कोलम समाजाच्या शांततेचा घेतला जाणारा गैरफायदा व कोलामांची होणारी विभागणी,जिवती तालुक्यातील खडकी गावचा, १५ ऑगस्ट,विदयार्थी टॉपर तरी शाळेत नोकरी नाही, यंत्रणेचे दूर्लक्ष व १० लाखाचं  आश्वासनाचं स्वप्न व उर्वरीत रक्कमेसाठी करावा लागणारा संघर्ष,पोडांवर अंगणवाडी मंजूर, पण तिथे ४ वर्ष विटा / वाळू तशाच पडलेल्या  असं चित्र समोर आणलं व योजना परततात कशा हे सोदाहरण सांगून कोलामांच्या जगण्याचा वेदनेला  या परिसंवादातून आवाज दिला.
      भाऊसाहेब राठोड यांनी पारधी समाजाच्या जीवन पद्धती बद्दल विस्तृत विवेचन केलं.आपला शत्रू आपली जात व वर्ण व्यवस्था आहे असं सांगत पारधींमधील मुलांच्या नावाची गोष्ट सांगितली. बंजारा स्त्री  पारध्यांची देवी आहे. ते विविध धार्मिक प्रसंगी रात्री पुजन व गीत नृत्य सादर करतात हे सांगितले. बंजारा व  पारधी यांच्यातील जवळीकीमुळे ते  बंजारांना 'मासिको बेटो ' म्हणतात, असं त्यांनी सांगीतलं व पारधी समाजात एकतेच्या गरजेवर भर दिला. पारधी एका गावाहून दुसऱ्या गावात जातांना होणारी नोंद जाचक
आहे. यावर मत व्यक्त केलं.सर्व भटक्यांना एकत्र केलं तर  मोठी शक्ती निर्माण होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं.
        बहारदार शैलीत केलेलं संचलन श्रोत्यांपर्यंत कथा आणि व्यथा : तांड्यांच्या आणि पोडांच्या पोहोचविण्यात परिसंवादाचे समन्वयक डॉ.कमलदास राठोड यशस्वी ठरले


लेखक .. एकनाथ गोफणे....


लेख वाचून प्रतिक्रिया ब्लॉग वर लिहा..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...