बंजारा स्त्री चे वास्तव जीवन
२१ वे शतक , आधुनिक आणि मनाला प्रगल्भ व बुद्धीला अधिक तेजस्वी करणारे शतक म्हणून पाहिलं जातं ... या २१ व्या शतकातील बंजारा स्त्रीयांची कौटुंबिक , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक .स्थिती _दिशा आणि दशा या बाबत आपण विचार करणे गरजेचे आहे...बंजारा स्त्री चे वास्तव जीवन या सर्व गोष्टीतून बघण्याची आज आवश्यकता का भासते ?
याचं उत्तर अजूनही, बंजारा स्त्रीयांचा जीवन प्रवास , 'कडापो ' म्हणजे दुःखाच्या कठीण रस्त्यावरुनच सुरु आहे.. हे वास्तव कुणीही नाकारु शकत नाही..
कौटूंबिक बाबतीत विचार केला तर असे दिसून येते की , बंजारा स्त्रीच्या अंतरीक ऊर्जेला ८५ % घरात कौटूंबिक विरोध असतो.
काळानुरुप संघर्ष तीचा सुरुच आहे.कौटूंबिक स्थिती मजबूत करतांना , विविध पातळीवर तिची दमछाक होते.परिणामी बहुतांश स्त्रीया ' अंधश्रद्धा व घातक रुढींच्या शिकार होतांना दिसत आहेत... तांडा सोडून शहरात वास्तव्य करणाऱ्या स्त्रीया सुद्धा आपलं दुःख मनात ठेवून जीवन जगतांना दिसत आहेत... नोकरी व व्यवसाय करणाऱ्या २० % स्त्रीयांना सुद्धा काही प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक संघर्षाला सामोरे जावे लागते.
सामाजिक कार्य करुन आपले स्वतंत्र अस्तिव निर्माण करणाऱ्या महिलांवर पण टिका करण्याचे प्रकार काही अंशी सुरु आहेत.
राजकिय क्षेत्रात ग्रामिण ते राज्यपातळीवर कार्य करणाऱ्या , काही लोकप्रतिनिधी बंजारा महिलांना आपले कार्य स्वतंत्रपणे करता येत नाही..
महिलांचे पती किंवा मुलं अथवा कुटूंबातीत इतर पुरुष मंडळी स्वतः पुढारपणाचा आव आणतात .. त्यामुळे पदावरील महिला सक्षमपणे कार्य करु शकत नाही. समस्त स्त्रीयांची समस्या समर्थपणे मांडू शकत नाही.
शैक्षणिक _ म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या शैक्षणिक जागरातून ' तांडयाच्या झोपडया ' जागल्या. तांडा शिक्षण घेण्यास पुढे येऊ लागला. तांडयाच्या झोपडयांमधून शिकून नवी ध्येय गाठणारी बंजारा कन्या , आज अनेक क्षेत्रात कार्यरत आहे..
सरकारी नोकरीत कार्यालयीन शिपाई ते प्रशासकिय अधिकारी पदापर्यंतचा या सर्व बंजारा हरपणींचा प्रवास एक आशेचा किरण म्हणून पाहिला जातो.
क्रिडा क्षेत्रात सुद्धा बंजारा स्त्री स्वतंत्र ओळख निर्माण करतेय... शिक्षणाने आज बंजारा स्त्री , अभियांत्रिकी , वैदयकिय, शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र व समर्थपणे उभी आहे.. या प्रेरणेने तांडयाचा शिक्षणरथ वेगाने दौडायला लागलाय.
तरी सुद्धा शिक्षण घेवून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या बंजारा भगिनींनी तांड्यातल्या इतर मुलींना प्रेरणा देण्याचे कार्य करणे गरजेचे आहे..
'तारी कल्पनाती
उची जागाप चलोजो
हेट छ ,ओनुनबी उपर लेजो
लायक बणन नायक व्हेजो
सेवा करन सारीरी
सेवा तु रे व्हेजो '
हा 'सेवा विचार ' रुजविण्याची गरज आहे...
सांस्कृतिक क्षेत्रात - बंजारा लदेणी काळात सांस्कृतिक क्षेत्रात बंजारा स्त्रीयांची आघाडी होती. सध्या मात्र सर्वच पातळ्यांवर संघर्ष करतांना बंजारा स्त्रीयांची होणारी दमछाक ,सांस्कृतिक क्षेत्रात मागे राहण्याचे कारण म्हणावे लागेल... बंजारा संस्कृतीची
पारंपारिकता जपत आधुनिकतेचा स्विकार करण्याची गरज आहे..
डिसेंबर मध्ये नागपूर येथे झालेल्या बंजारा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मा.सुनिता ताईंना मिळाला.. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अधिक प्रभावी कार्य करण्याची नवी ऊर्जा बंजारा महिला वर्गात निर्माण झाली ... ही आनंददायी बाब आहे..
.... 🙏🙏
दशा -शिक्षणामुळे आपला जीवनसाथी स्वतः निवडण्याची क्षमता बंजारा युवती मध्ये निर्माण झाली.. तरीही काही प्रमाणात सामाजिक अडसरांची शिकार तिला व्हावं लागत आहे..
फेसबुक , what's app, युट्यूब या समाज माध्यमावर शिक्षण घेतलेली बंजारा स्त्री थोड्याफार प्रमाणात व्यक्त होतेय... YouTube वर सुद्धा खूप असे videos बघायला मिळतात जे बंजारा संस्कृतीचे विशाल दर्शन घडवितात पण काही व्हिडीओ सांस्कृतिक विकृतीकरणाचे माध्यम होत आहेत असं वाटतयं.. या कडे पण लक्ष देण्याची गरज आहे..
दिशा -
२१ व्या शतकात बंजारा स्त्री समर्थ पणे उभी रहावी , यासाठी तिचं शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे.कुटूंबियांनी या कडे लक्ष देण्याची गरज आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी कौटूंबिक ऊर्जा , एक नवी प्रेरणा आहे.. स्त्रीयांनी सुद्धा साहित्य क्षेत्रात पुढे आले पाहिजे.. स्वतःचे दुःख शब्दातून मांडले पाहिजे.. तांडयातील समस्त स्त्री जीवना पुढील आव्हाने कथा , कविता , कादंबरी या माध्यमातून पुढे आले पाहिजे. वैद्यकिय , शिक्षण , आरोग्य , कायदा व प्रशासनिक क्षेत्रात कार्यरत महिलांनी पुढे आले पाहिजे.. सामाजिक घातक प्रथांना विरोध करुन , बंजारा समाजातील समस्त स्त्री वर्गाचा ' कडापो ' दूर केला , तिच्यात आत्मविश्वास व नवी प्रेरणा निर्माण व्हावी या साठी संवाद वाढविला पाहिजे... ' जुनं सोडता येईना, नवं घेता जमेना ' अशा द्विधा परिस्थितीत अडकलेल्या बंजारा स्त्रीला ' वाचन , चिंतन मनन , करण्याची हिंमत या तंत्रयुगात देण्याची गरज आहे..
समाजातील विविध सामाजिक संघटनांनी , राजकिय क्षेत्रात कार्यरत घटकांनी सुद्धा बंजारा स्त्रीयांच्या उत्कर्षाच्या बाबतीत स्वतंत्र कृती कार्यक्रम राबविला पाहिजे..
२१ व्या शतकातील बंजारा स्त्रीयांची कौटुंबिक , सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक .स्थिती _दिशा आणि दशा या बाबत आपण विचार करणे गरजेचे आहे...
.....
लेखक _ एकनाथ गोफणे.....
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा